Download App

PM Modi In Loksabha : ‘देशाला घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य

नवी दिल्ली : मोठ- मोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार यापासून देशाला स्वातंत्र्य हवे होते, (PM Narendra Modi) ते देशाला मिळत आहे, असे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले. (Lok Sabha) धोरणात्मक लकव्यातून बाहेर पडून आज देश वेगाने विकासाच्या मार्गावर आहे. मला अपेक्षा होती की काही लोक अशा गोष्टींना नक्कीच विरोध करतील. पण कोणीही विरोध केला नाही. पंतप्रधान मोदी लोकसभेत म्हणाले की आव्हानांशिवाय जीवन नाही. (President Droupadi Murmu)
अनेक देशांमध्ये प्रचंड महागाई आहे. खाण्यापिण्याचे संकट आहे. तीच परिस्थिती आपल्या देशात देखील आहे. (Budget Session Parliament ) अशा परिस्थितीत कोणत्या भारतीयाला अभिमान वाटणार नाही, अशा काळातही देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आज जगाचा भारतावर विश्वास आहे.

आज भारताला जगातील श्रीमंत देशांच्या G20 गटाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. पण मला असे वाटते की, काही लोकांना यामुळे वाईट वाटत आहे. भारतात एक स्थिर सरकार आहे. अनेक वर्षांनी भारतात राजकीय गोंधळ नाही. राष्ट्रहिताचे निर्णय घेणारं आपलं हे सरकार आहे. आपल्या देशातले बदल हे सक्तीने होत नाहीत. तर काळाची गरज आहे म्हणून होत आहेत. कोरोना काळात मेड इन इंडिया लस तयार झाली. भारताने जगातलं सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आपल्या देशाने १५० पेक्षा जास्त देशांना आपण औषधं पोहचवली, लस पोहचवली. भारतातले अनेक देश असे आहेत ज्यांना भारताविषयी कृतज्ञता वाटते. करोना काळात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली.

एक काळ असा होता जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी भारतात वाट बघावी लागायची आज टेक्नॉलॉजीच्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अनेकांना मी काय म्हणतो आहे ते समजण्यास थोडा वेळ लागेल असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. आज भारताच्या समृद्धीमध्ये जग आपली समृद्धी पाहतं आहे. निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आपल्या देशाची प्रगती पाहूच शकत नाहीत सहन करू शकत नाहीत. भारताच्या १४० कोटी लोकांच्या शक्तीमुळेच आज देशाचा डंका जगभरात वाचतो आहे.

गेल्या ९ वर्षात ९० हजार स्टार्ट अप्स सुरू झाले आहेत. स्टार्ट अप विश्वात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आज भारत जगभरात मोबाइलच्या निर्मितीतला दुसरा देश आहे. डोमेस्टिक विमान प्रवासाच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत या सगळ्या बाबी आपल्यासाठी अभिमानास्पद आहेत यात माझ्या मनात काहीही शंका नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशातल्या प्रत्येक क्षेत्रात मला आशा आणि स्वप्नं दिसत आहेत. आपली स्वप्नं आणि संकल्प घेऊन लोक पुढे जातो आहे.

मात्र लोकसभेत काही लोक खूप निराशेत बुडून गेले आहेत. ही निराशा अशीच आलेली नाही. यामागे एक कारण आहे. जनतेने आम्हाला इथे बसवलं आहे एकदा नाही दोनदा बसवलं आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. आता याच लोकांना मळमळ होते आहे, निराशा होते आहे. ज्यांनी बेरोजगारी दूर करण्याची वचनं दिली होती ते काहीही करू शकले नाहीत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

follow us