Rahul Gandhi Criticize Amit Shah for his Statment on Englih Language : सध्या राज्यात शासनाकडून पहिलीपासून तिसरी भाषा (Third Language) म्हणून हिंदी किंवा भारतीय भाषा शिकविण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. त्याच दरम्यान केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी 19 जून रोजी एका कार्यक्रमात बोलताना हिंदीचं समर्थन आणि इंग्रजीच्या वापराला विरोध दर्शवला होता. त्यावर आता कॉंग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पलटवार केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
BJP-RSS ला (Rahul Gandhi) गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकावं असं वाटत नाही. कारण ही मुलं त्यांना प्रश्न विचारतील, पुढे जातील, श्रीमंतांच्या मुलांची बरोबरी करतील.मात्र आजच्या काळात मातृभाषेबरोबरच इंग्रजी देखील तेव्हढीच महत्त्वाची आहे. त्यातूनच रोजगार आणि आत्मविश्वास मिळेल. भारताच्या प्रत्येक भाषेमध्ये आत्मा आहे, संस्कृती आहे, ज्ञान आहे. आपल्याला त्यांचं संरक्षण करायचं आह. मात्र त्याचबरोबर प्रत्येक मुलाला इंग्रजी देखील शिकवायची आहे. इंग्रजी शिकणं हाचएक मार्ग आहे. ज्यातून भारत जगाचा सामना करू शकेल. प्रत्येक मुलाला समान संधी मिळेल.
अंग्रेज़ी बाँध नहीं, पुल है।
अंग्रेज़ी शर्म नहीं, शक्ति है।
अंग्रेज़ी ज़ंजीर नहीं – ज़ंजीरें तोड़ने का औज़ार है।BJP-RSS नहीं चाहते कि भारत का ग़रीब बच्चा अंग्रेज़ी सीखे – क्योंकि वो नहीं चाहते कि आप सवाल पूछें, आगे बढ़ें, बराबरी करें।
आज की दुनिया में, अंग्रेज़ी उतनी ही ज़रूरी… pic.twitter.com/VUjinqD91s
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2025
काय म्हणाले होते अमित शाह?
भारताचा भाषिक वारसा परत मिळवण्याची वेळ आली आहे आणि राष्ट्राची ओळख त्याच्या स्वतःच्या भाषेवरून होते. असं एका कार्यक्रमात बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले. तसेच मूळ भाषांमध्ये अभिमानाने जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आता आली आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. गृहमंत्री शाह आज माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री (Ashutosh Agnihotri) यांनी लिहिलेल्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना भारताने वसाहतवादी प्रभावाचे अवशेष सोडून द्यावेत आणि अभिमानाने स्वतःच्या भाषा स्वीकारल्या पाहिजेत. असं म्हटले आहे.
कॅन्सरची लक्षणे दिसण्याच्या आधीच कळणार आजाराचा पत्ता; चमत्करिक शोध यशस्वी
पुढे या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या देशात, इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. केवळ दृढनिश्चयी लोकच बदल घडवून आणू शकतात. माझा विश्वास आहे की आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीचे रत्न आहेत.
इस्त्रायल इराण युद्ध अन् भारताचं 47 हजार कोटींचं नुकसान, वाचा प्रकरण काय?
आपल्या भाषांशिवाय आपण खरे भारतीय नाही. आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास आणि आपला धर्म समजून घेण्यासाठी कोणतीही परदेशी भाषा पुरेशी असू शकत नाही.अर्धवट भाजलेल्या परदेशी भाषांमधून पूर्ण भारताची कल्पना करता येत नाही. ही लढाई किती कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय समाज ही लढाई जिंकेल. असं अमित शाह म्हणाले.