Download App

सिद्धरामय्या कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडणार? स्वामींच्या विधानाने ‘वादळ’, DK शिवकुमारांना संधी?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पद सोडणार? DK शिवकुमारांना मिळणार संधी? चंद्रशेखर स्वामींच्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे.

  • Written By: Last Updated:

Shri Chandrasekhar Swamy : विश्व वक्कलीग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामीजी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सर्वजण मुख्यमंत्री झाले पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या ( Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपद सोडून शिवकुमार यांना संधी द्यावी, असं थेट वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Karnataka) नाडप्रभू केम्पेगौडा हेरिटेज साईट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, बीबीएमपी आणि कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे शहरातील कंठिरवा स्टेडियमवर आयोजीत नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिवकुमार हे व्यासपिठावर उपस्थित होते.

त्यांनी आता पद सोडावं पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा; सभागृहात फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले, ‘सिद्धरामय्या यांनी मन मोठं केल्यास हे शक्य आहे. सिद्धरामय्या यांना पुन्हा एकदा विनंती करतो. कृपया, शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा. सर्वांनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगली आहे. आमचे शिवकुमार झाले नाहीत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून खूप अनुभव आहे. शिवकुमार यांच्यासाठी त्यांनी आता पद सोडावं. पुढील काळात त्यांचं कल्याण होवो. हे केवळ सिद्धरामय्याच करू शकतात. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची विनंती करत आहे असही स्वामी यावेळी म्हणाले आहेत.

बंगळूरूला स्थलांतर

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक असे दोन प्रांत निर्माण केले आणि उत्तर कर्नाटकचा सर्वांगीण विकास झाला तर त्या भागातून बंगळूरला होणारे स्थलांतर टाळता येईल, असंही स्वामी यावेळी म्हणाले आहेत. कार्यक्रमाला पट्टनायकनहळ्ळी श्रीक्षेत्र श्री स्पटिकपूर महासंस्थानचे अध्यक्ष श्री डॉ. नंजावधूत स्वामीजी, आदिचुंचनगिरी महासंस्थेचे पीठाध्यक्ष डॉ. श्री निर्मलानंदनाथ महास्वामीजी, मंत्री कृष्णा भैरेगौडा, शिवराज तंगडगी, आमदार रिझवान हर्षद, विश्वनाथ, विधान परिषद सदस्य पुटण्णा, गोविंदराजू, सलीम अहमद, रामोजी गौडा, वक्कलीग संघाचे अध्यक्ष हनुमंतरायप्पा आदी उपस्थित होते.

हा निर्णय हायकमांडकडे धक्कादायक! वाळू माफियांवर मंत्र्यांचं अजब उत्तर, थोरात-विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी

स्वामीजींच्या आवाहनानंतर पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देताना सिध्दरामय्या म्हणाले, ‘मुख्यमंत्री बदलण्याचा अधिकार हा विषय पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही कार्य करतो. त्याबाबत आम्ही राज्य पातळीवर कोणताही निर्णय घेत नाहीत. मी मुख्यमंत्री करतानाही हायकमांडने जो निर्णय केला तोच आम्ही मान्य केला. त्यामुळे तसा काही निर्णय होणार असेल तर सर्वस्वी हायकमांडकडेच होतो असंही सिध्दरामय्या म्हणाले आहेत.

follow us