Download App

‘सत्ताधारीच कायदा सुव्यस्थेचे भक्षक’; अंबादास दानवे अधिवेशनात कडाडले

Ambadas Danve : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळाले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारांवर आवाज उठवत अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) सरकालाच जबाबदार धरलं आहे. सत्ताधारीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक झाल्याचा आरोप अंबादान दानवेंनी केला आहे.

जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, ड्रग्ज, दंगलीवरुन सभागृहात खडाजंगी…

अंबादास दानवे म्हणाले, सरकार जनतेच्या मुळावर आणि शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही पॅकेज दिलं नाही. हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले असून राज्याला विकासापासून दूर नेण्याचं प्रयत्न करणार हे सरकार करत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी, मराठा समाजाला आरक्षण देण्यास असमर्थ ठरले असून हे सरकार कायदा व्यवस्थेचे भक्षक झाल्याचं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

राज्यात संघटीत गुन्हेगारीत वाढ झाली असून दिवसाढवळ्या होत असलेले खून, महिला अत्याचार, राज्यात मोठया प्रमाणात झालेल्या दंगलीच्या घटना या सर्व घटना राज्याला भूषणावह नाही, असे दानवे यांनी अंतिम आठवड्यावरील प्रस्तावावर भाष्य करताना स्पष्ट केलं आहे.

Parliament Suspended : इतक्यात सुटका नाहीच! उपराष्ट्रपतींची नक्कल करणाऱ्या खासदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

नागपुरात कायदा सुव्यवस्था राखण्यास गृहमंत्री अपयशी :
मागील 5 वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस व कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर केला नाही. मागील ५ वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे? विदर्भात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. नागपूरमध्ये महिला अत्याचार, खून दरोडे यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाली असून येथील तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. नागपूरचे पालकमंत्री हे गृहमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका दानवे यांनी केली.

सरकार हे टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचे काम करत असून जनतेच्या हिताचे कोणतेही काम करत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला. तसेच मुंबई महानगरपालिकेत मोठया प्रमाणात सुरू असलेली लूट, रखडलेल्या पालिका निवडणुका, सिडकोने ६७ हजार घरांची विक्री करण्यासाठी खासगी संस्थेसाठी ६९९ कोटी रुपयांची काढलेली निविदा यावर दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधलं आहे. तसेच राज्यात मोठया प्रमाणात ड्रग्स कारखान्यांवर कारवाई झाली. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी जेल अधीक्षकावरही कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.

Tags

follow us

वेब स्टोरीज