Anil Deshmukh : ईडी, सीबीआय (CBI) अशा यंत्रणांनी माझ्या घरी आणि इतर 170 ठिकाणी धाडी टाकल्या. माझी 6 वर्षांची नात आहे. तिलाही महिला अधिकाऱ्यांनी कॅटबरी चॉकलेट देऊन तिची चौकशी केली होती, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सांगितलं. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात द्वेषाचं राजकारण कधीच नव्हतं. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार हे राजकीय विरोधक असले तरी त्यांनी सूडाचं राजकारण केलं नाही. जांबुवंतराव धोटेंनी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्यावर टीका केली. मात्र, वसंतरावांनी सत्तेचा दुरुपयोग केला नाही. नंतर वसंतरावांच्या मृत्यूनंतर जांबुवंतराव ढसाढसा रडले होते. आज सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणचा वापर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यासाठी करतात. सत्ता मिळवण्यासाठी केला जात आहे. सरकार पाडण्यासाठी वापर केला जातो. स्वार्थासाठी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे, अशी टीका देशमुखांनी केली.
‘संगीत संन्यस्त खड्ग’ नव्या स्वरुपात; शुभारंभाचा प्रयोग 8 जुलै
सत्ताधाऱ्यांकडून फक्त बदला घेण्याचे काम सध्या सुरू आहे. संजय राऊत जास्त बोलतात म्हणून खोट्या केसेस टाकून जेलमध्ये टाकलं. मी राज्याचे गृहमंत्री असतांना माझ्यावर अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला. परमवीर सिंह आणि सचिन वाझेंनीच प्लॅनिंग केल्याचं समोर आल्यानंतर आम्ही परमवीर यांची बदली केली. वाजेंना सस्पेंड केलं, परमवीर सिंह यांना सस्पेंड केल्यामुळे त्या दोघांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला. त्यामुळं विरोधकांनी मला लक्ष केलं. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मी सांगितलं की, माझ्यावर आरोप केला त्यांना कोर्टात बोलवा, परमवीरला 6 समन्स पाठवले, पण ते माझ्याविरोधात पुरावा द्यायला आले नाहीत. देशातून फरार झाल्यानंतर मी केलेल्या आरोपाचे पुरावे नाहीत, असं अॅफिडिव्हेट सादर केलं.
माझ्यावर 170 धाडी
देशमुख म्हणाले, 8 महिने मला बेल मिळवू दिली नाही, 5 न्यायधीश बदले गेले, 8 महिने सुनावणी झाली नाही. पण बेल भेटली नाही. मी सुप्रीम कोर्टात गेलो तेव्हा कपिल सिब्ब्ल यांनी बेल मिळवून दिली. मी 14 महिने जेलमध्ये होता. माझ्यावर 170 धाडी ईडी, आयटी आणि सीबीआयच्या धाडी टाकण्यात आल्या. महिला अधिकाऱ्यांनी कॅटबरी चॉकलेट देऊन माझ्या 6 वर्षाच्या नातीची चौकशी केली… मी समझोता केला असता तर मला चौकशीला सामोरं जावं लागलं नसतं, पण ते केलं नाही, असं देशमुख म्हणाले.
ते म्हणाले, मी जेव्हा जेव्हा संजय राऊतांना भेटायला जायचो, तेव्हा ते काहीतरी लिहित बसायचे. मी बोलायचो काय लिहिताय, ते मला म्हणायचे उद्याचा सामना वाचा… ते अग्रलेख असायचे. मला मथळा वाचून दाखवाये. दुसऱ्या दविशी सामनात अग्रलेख जसाच्या तसा… आतमध्ये त्यांनी व्यवस्थित यंत्रणा लावली होती, असा गौप्यस्पोटही राऊतांनी केला. संजय राऊत यांच्या आग्रहावरून मी पुस्तक लिहायला घेतलं. संजय राऊतांच्या आग्रहाखातर मी लेखक झालो, अशी माहिती देशमुखांनी दिली.