अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट

अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट

Samit Kadam on Anil Deshmukh : गेली अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्या आरोपयुद्ध सुरू आहे. देशमुख्यांनी काही आरोप केले की फडणवीस पुरावे सादर करणार असल्याचं सांगतात. त्यामुळे या दोघांची एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे. अशातच आता ( Anil Deshmukh ) देशमुख यांनी समीत कदम यांचं नाव घेतलं आहे. त्यावर कदम यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक

देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस असणाऱ्या समीत कदम यांनीच एका बंद पाकिटात त्यांचा निरोप आपल्याला दिला, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात समीत कदम यांचं नाव आता चर्चेत आलं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडेही देशमुखांच्या रेकॉर्डिंग्ज असून त्यांनी पुरावे जाहीर केल्यानंतर आपण त्या रेकॉर्डिंग्ज जाहीर करू, असं आव्हान दिलं आहे. आता समीत कदम यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

समीत कदम काय म्हणाले?

समीत कदम यांनी अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल देशमुख यांनी चॅनलवर माझे व फडणवीसांचे फोटो दाखवले. यात नवीन काही नाही. त्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत. हे फोटो वर्तमानपत्रातही आले आहेत, असं समीत कदम म्हणाले आहेत आहेत.

Maharashtra: चार वर्षात 12 हजार उद्योगांची वाताहात; पाच लाख कामगारांनी गमावले हातचे काम

जनसुराज्य शक्ती हा २०१६ पासून आमचा स्वतंत्र पक्ष आहे. मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. जेव्हा आम्ही एनडीएचे घटकपक्ष झालो, तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी बैठकांचं, कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यात होणार्‍या वेगवेगळ्या बैठकांसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच इतर पक्षीय नेत्यांचीही भेट होते. त्यात फार मोठं काहीतरी झालं असं सांगण्यात काही अर्थ नाही. मला तो काही फार मोठा विषय वाटत नाही, असं म्हणत समीत कदम यांनी देशमुखांना उत्तर दिलं आहे.

नंतर ओळख झाली

सांगली-मिरज काय, मी एका घटकपक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. मला या राज्यातले सगळे नेते ओळखतात. अनिल देशमुख कदाचित विसरले आहेत. ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून माझी त्यांच्याशी ओळख आहे. पण देवेंद्र फडणवीसांशी माझी नंतर ओळख झाली आहे. त्यामुळेच त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. ते वारंवार सांगत राहणं, यात मला अर्थ वाटत नाही, असा दावाही त्यांनी केला.

ते हे वारंवार सांगतायत याचा अर्थ तीन वर्षांनी हा विषय मांडून फक्त देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीच्या आधी नुकसान पोहोचवण्याचा हेतू आहे. आता हा विषय रटाळ झालाय. अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय याशिवाय दुसरं काही बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत असंही समीत कदम म्हणाले आहेत. तसंच, त्यांनी आरोप केला तसा कोणताही विषय नाही. त्यांनी माझी भेट घेतली. त्या दिवशी त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. एवढाच विषय होता. तीन वर्षं तुम्ही काय करत होतात? असा सवालही समीत कदम यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube