Download App

नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा…अजितदादा व जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार जुंपली!

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On Ajit Pawar : बारामतीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारबाबत (Sharad Pawar) एक विधान केले होते. कुणी भावनिक होतील, शेवटची निवडणूक आहे म्हणतील. असेच आहे, तसेच आहे म्हणतील, त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहिती नाही. पण तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे, असेही अजित पवार म्हणाले. त्यावर अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुनावले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. दोघेही एकमेंकाना ‘एक्स’वरून जोरदार उत्तरे देत आहेत.

मोठी बातमी! राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकडे कोणता विभाग?

अजित पवार यांचे बोलणे हे चीड आणणारे व संतापजनक आहे. आपल्या काकाची मृत्यूची वाट बघणार काय माणूस आहे हा. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील, असा शब्दात आव्हाडांनी अजितदादांवर हल्लाबोल केलाय. त्याला आता अजितदादांनी ट्वीटरवरून त्याचपद्धतीने उत्तर दिले आहे. काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझे पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढेच म्हणणे होते की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेले आहे, असे अजित पवार यांनी आपल्या एक्समध्ये केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणे मांडत आहे, असे म्हणत अजितदादांनी जितेंद्र आव्हाडांना फटकारले आहे.

‘भारतीय लोकं आळशी असल्याचं नेहरुंचं मत’; PM मोदींनी भाषणाचा दाखलाच दिला…


नाही तर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती

अजित पवारांनाही जितेंद्र आव्हाडांनी लगेच जोरदार उत्तर दिले आहे. नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात.
साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा ? तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले
जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच, नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते, असे म्हणत आव्हाडांनी अजितदादांना उत्तर दिले आहे.

follow us