Download App

आपत्ती व्यवस्थापनात एकनाथ शिंदेंची एन्ट्री! फडणवीसांनी फिरवला निर्णय, कारण…

  • Written By: Last Updated:

Eknath Shinde Included In Disaster Management Committee : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदलण्याचा (Disaster Management Committee) निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वगळण्यात आलं होतं, त्यामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या समितीत राहणार आहे.

मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष (Fadnavis Goverment) असतो. त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल, मदत आणि पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता.

सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या…संसदेत आंदोलन, निलेश लंकेंसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या कारणावरुन महायुतीत वितुष्ट निर्माण होऊ शकते, अशी चर्चा (Maharashtra Politics) होती. त्यामुळे आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करुन घेण्याचा निर्णय झाला आहे.

मागील काही काळापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पालकमंत्री पदाच्या वाटपावरुन देखील शिवसेना अन् भाजपात संघर्ष रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नगरविकास खात्याची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित ठिकाणी पोहोचवली जाते. तरी देखील खुद्द एकनाथ शिंदे यांनाच आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेतल्याने सुद्धा चर्चा सुरू होत्या.

जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, माझ्या घरावर रेकी; लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसतोय. रायगड अन् नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद देखील अजून मिटलेला नाहीये. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून देखील शिंदेंना वगळल्याचं समोर आलं होतं. पण वेळीच मंत्रिमंडळाने निर्णय बदलल्याने महायुतीवरील संकट टळल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वृत्त देखील समोर येतच आहेत.

 

follow us