Download App

Video: बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे कोण?, संजय राऊतांनी थेटचं सांगितलं

राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये ते काल बीड येथे असताना त्यांच्या गाडीसमोर काही तरुणांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यावर राऊत बोलले.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on Raj Thackeray :  मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बीड येथे ते पोहचल्यानंतर काही तरुणांनी त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या. (Raj Thackeray) त्यावरून जोरदार राजकीय खडाजंगी सुरू आहे. यामध्ये काही शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्तेही सहभागी होते. त्यावरूनही आरोप प्रत्यारोप सुरू असून त्यावर आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून त्यांचा विकास खुंटला; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपार्‍या फेकल्या ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्या आंदोलनाचा पक्ष म्हणून काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं, आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात विशेषता मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला, असंही राऊत म्हणाले आहेत.

बीडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असेल त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे स्पष्ट करतो. मी असं म्हणत नाही ते आमचे कार्यकर्ते नसावेत ते 100% असतील, पण ते आंदोलन पक्षाचे नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केलं. मनसेने विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. त्यातच बीडमध्ये सुपारी आंदोलन झाले. राज ठाकरे हे बीड शहरात आल्यानंतर हा प्रकार घडला.

बीडमध्ये राडा! राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या अन् मनसेकडून इशारा

सुरुवातीला मराठा आंदोलकांनी हा प्रकार केल्याचं समोर येत होतं. पण त्यामागे उद्धव ठाकरे गटाचे आंदोलक असल्याचं स्पष्ट झालं. घटनेवेळी मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. राजकीय विरोधातून हा प्रकार करण्यात आला. मराठा आरक्षणाचा त्याच्याशी काहीच संबंध नसल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुरुवात उद्धव ठाकरे गटाने केली, आता शेवट आम्ही करू असा इशारा दिला आहे. त्यावर शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी बीडमधून सुरुवात केली, शेवट मुंबईत करु असा पलटवार केला आहे.

follow us