Manikrao Kokate : पुढील वर्षभरात पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ होईल आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री म्हणून पंढरीत येतील, असं विधान काल (दि. 21 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं. त्यानंतर आणखी एका बड्या नेत्याने अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलं.
इराण खवळला! अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर इस्त्रायलवर पलटवार; 10 शहरांवर इराणी मिसाइल कोसळल्या
माणिकराव कोकाटे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. कालच्या आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, इच्छा असण्यात वाईट काय? मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ आहे आणि त्या आकड्यांच्या गणितात प्रत्येक पक्ष आपापलं काम करत असतो. आम्हालाही वाटते की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यात चुकीचं काय आहे?, असं ते म्हणाले.
ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयी मिरवणूक काढता येणार क? BCCI चे नवे 8 नियम काय?
विशेष म्हणजे अजित पवार यांनीही आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपवून
ठेवली नाही. त्यांनी वेळोवेळी आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे. आमदार अमोल मिटकरींनी काल पंढरपूरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना मिळावा, असं साकडं आपण पांडुरंगाला घातलं. पांडुरंगाच्या मर्जीनं राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील, असंही ते म्हणाले होते. तर आता कोकाटेंनीही आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, असं विधान केलं. कोकाटे यांच्या विधानावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पालकमंत्रीपदाविषयी कोकाटे काय म्हणाले?
दरम्यान नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून महायुती जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिकमधून पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे दादा भुसे आग्रही आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांचे नावही या पदासाठी चर्चेत आहे. अलीकडेच छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानं त्यांचंही नाव पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. याबाबत विचारलं असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, नाशिकच्या बाबतीत फार विवाद नाहीत. पालकमंत्री पदावर कोणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.