Download App

चंद्रकांत पाटलांना काय कळतं? फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात…; जरागेंचा हल्लाबोल

चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं? फक्त 'तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात.

Manoj Jarange On Chandrakant Patil : मराठा समाजाला आरक्ष (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांनी मोठा लढा दिला होता. आताही जरांगेंच्या भूमिकेकडे मराठा बांधवांचं लक्ष लागलं. अशातच आता जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलतांना त्यांनी मंत्र चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही हल्लाबोल केला.

माझंही 2019 ला तिकीट कापलं पण मी साथ दिली; “लेट्सअप चर्चेत” स्मिता वाघ थेट बोलल्या 

जरांगे म्हणाले, मी 8 जून रोजी नारायणगड येथे भव्य सभा घेत आहे. 15 मे रोजी मी तिथल्या जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर राज्यभरातल्य सगळ्या मराठा बांधवांना या विराट सभेसाठी आवाहन करण्यात येईल. या सभेसाठी सहा कोटी मराठा बांधव येणार असल्याचेही जरागेंनी स्पष्ट केले आहे. 15 मे च्या पाहणीनंतर मी सभेविषयी अंतिम निर्णय घेईल. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतांना चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का, असा सवाल उपस्थित केला.

भुजबळांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे…; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान 

चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का केलं आहे? त्यांना काय कळतं? फक्त ‘तेरे नाम; भांग पाडून हिंडत असतात. स्वत:ची 37 मत तरी त्यांना पडतात का? असं म्हणत जरागेंनी पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

यावेळी बोलतांना त्यांनी पंकजा मुडेंवरही टीका केली. पंकजा मुंडे यांना पाडा, असं मी कुठंच बोललो नाही. उलट त्या जातीयवादी राजकारण करत आहेत. भर सभेत त्या म्हणतात, आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे. त्याचवेळी मंचावर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणं गरजेचं होतं. मात्र, त्यांनी आक्षेप घेतल नाही. त्यांना लाज वाटायला पहिजे, असं जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावं, एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला, मी त्यांचं नाव लगेच घेणं बंद करतो. माझा एकच सवाल आहे, आमच्यावर गुन्हे कोणी दाखल केले? आमच्याविरुद्ध एसआयटी का नेमली? याचे उत्तर द्या, असं सवाल जरागेंनी उपस्थित केले आहेत. आम्ही भाजपच्या विरोधात कधीच नव्हतो, अन्यथा भाजपचे 106 आमदार निवडून आले नसते, असंही जरांगे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज