Download App

उद्या निर्णायक बैठक! आंतरवालीत खलबतं, जरांगेच्या मुंबई मोर्चाचा रूट ठरणार

Manoj Jarange Held Maratha Samaj last meeting for 29 August : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा मैदानात ( Manoj Jarange) उतरले आहेत. मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी उद्या मराठा समाजाची अंतरवालीत शेवटची बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळावं म्हणून बैठक होणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे (Maratha Samaj last meeting) यांनी दिली आहे.

मराठ्यांचा संयम बघू नका. मराठ्यांचा अपमान करू नका. सरकारला मी तर आता बघणारच म्हणत असं म्हणत जरांगे पाटलांनी थेट सरकारला इशारा दिली आहे. उद्या शेवटची बैठक आहे. त्यात आंदोलनाचा अंतिम निर्णय होणार असल्याचे संकेत जरांगे यांनी दिले आहेत.

Crime News : महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या, छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना

मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या अंतरवाली सारटी गावात मराठा समाजाची राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी मराठा समाजाला आजपर्यंत काय मिळालं? आणि काय मिळवायचे ? हा महत्वाचा या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचं सांगितलं.

अंतिम निर्णय असणार

दोन वर्ष मी समाजातील तरुणांना न्याय मिळावा म्हणून लढत आहे. ही शेवटची बैठक आणि शेवटचा लढा असल्याने आता सुट्टी नाही. मुंबईत जोपर्यंत पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलं. 29 ऑगस्टचं आंदोलन मात्र शांततेत असणार. विजय घेऊनच मुंबईतून मागे फिरणार म्हणत ही शेवटची बैठक आणि शेवटचा लढा आहे. मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्यांचा अपमान करू नका. सरकारला मी तर आता बघणारच आहे, असा इशारा देत मराठा समाजाला उद्याच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा आव्हान केलंय. शेवटची बैठक असून अंतिम निर्णय असणार असंही त्यांनी म्हटलंय.

Shefali Jariwala : तरुण दिसण्यासाठी…; शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं?

पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करू नका, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ठणकावलंय. लेकरा-बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका, सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका. उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार ? याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून, आपापली कामे सोडून बैठकीला या असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

 

follow us