Download App

अंमलबजावणीशिवाय मुंबई सोडणार नाही; मनोज जरांगेंनी उद्याचं आजच सांगितलं…

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीशिवाय आता मुंबई सोडणार नाही, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उद्याचं आजच पत्रकार परिषदेत सांगितलंय.

Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Manoj Jarange) मुद्दा पुढील दिवसांत पुन्हा तापणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांचा ताफा येत्या 29 तारखेला मुंबईत धडकणार आहे. आंतरवली सराटीतून तब्बल 10 ते 12 लाख गाड्यांचा मुंबईला निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी यावेळी केलीयं. मराठा आणि कुणबी एकच असून हैद्राबाद गॅझेट लागू करण्याची अंमलबजावणीपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी उद्याचं आजच सांगितलं आहे. ते आंतरवली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमरावतीच्या एपीआयची हत्या; फोर व्हिलरने उडवलं नंतर धारदार शस्त्राने सपासप वार, तीन आरोपींना अटक

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आंतरवली सराटीतून 10 ते 12 लाख गाड्यांचा ताफा मुंबईत घुसणार आहे. मुंबईत गेल्यानंतर मुंबईतील सर्वच आमदार आणि खासदारांना आम्ही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेराव घालणार असून जोपर्यंत मराठा कुणबी एकच आहेत, आणि हैद्राबाद गॅझेट लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही सर्वच मराठा समाजबांधव मुंबई सोडणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

तसेच आम्ही सर्वच आमदार, खासदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चर्चेला आंतरवली सराटीत बोलावलं होतं. आमचं आरक्षण द्या, असं सर्वच आमदार खासदारांनी मुख्यमंत्र्यांना समजावून सांगावं. मुंबईकडे निघणाऱ्या मोर्चामध्ये राजकीय नेता, येवो किंवा कुणीही येवो. तुम्ही थोडे देखील फुटले नाही. शेवटी जात काय असते, हे तुम्ही समाजाला दाखवून दिलंय. आता लढायचं आहे. आता रणभुमीत उतरायचं, सगळं मैदान मराठ्यांनी गाजयवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचं आता हटायचं नाही, असं मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केलंय.

‘तो’ आरोपी आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड; बंधू अन् अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

दोन वर्ष झाली मराठा लढत आहे. दोन वर्षांचा हा संघर्ष आणि लढाई मराठ्यांनी जिंकायची आहे. ही अंतिम लढाई असून राजकीय लोकं स्वत: निवडून येण्यासाठी मरमर करत आहेत, तुम्ही पण करता, परंतु तुमच्यासाठी कोणी मरमर करत नाही. तुमच्या जातीसाठी आणि लेकरासाठी ही मरमर करायची आहे. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्याने आता स्वत:च्या मुलावर गुलाल टाकण्याची तयारी करायची आहे. शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, केवळ आठ ते नऊ टक्के मराठा आरक्षण मिळण्याचा राहिला असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईत पोहोचायचं आहे. मुंबईसाठी येत्या 27 तारखेला निघायचं आहे, यावेळी आपल्याला सलग जायचं असून कुठेही न थांबता मुंबईत पोहोचयाचं आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांत आणि दोन रात्रीत मुंबईला पोहोचायचं. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत पोहोचायचं. यावेळेस मार्ग बदलायचा असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

follow us