Download App

छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील, तर पाडा; मनोज जरांगेंचे आदेश!

छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.

Manoj Jarange Patil : छगन भुजबळसारख्या (Chagan Bhujbal) पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची राज्यभरात सुरु असलेल्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये झाला. मनोज जरांगे यांची अहमदनगरनंतर नाशिकमध्ये शांतता रॅली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Government Schemes : डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजनेचा कोणाला अन् कसा फायदा मिळणार?

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मी इंचभरही मागे जात नाही. सगळे माझ्यावर दात घासून आहेत मला शारीरीक वेदना तरीही माझ्या स्वप्नापासून मी लांब जात नाही मला पोरं अधिकारी झालेले पाहायचे आहेत. मला पैसा आणि पद नकोयं, माझ्या समाजाला त्रास झालेला मला सहन होत नाही. त्यामुळे क्षत्रिय मराठ्यांनी आता पुढे यावं, मैदानात उतरावं आरक्षणासाठी छगन भुजबळासारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर त्यांना पाडा, असे आदेशच मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत.

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी टीका करणाऱ्या इतर आमदारांनाही चांगलचं धुतलंय. मनोज जरांगे म्हणाले, मुंबईतील आमदार वेड्यासारखं करत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईला चक्कर मारणार, कसल्याही आडनावाचे हे आमदार आहेत, एक राऊंड हाणून आलो मुंबईला की सरळ होतील. बोलणाऱ्या आमदाराचं घर कसं आहे हे पाहायचंय, त्याच्या घरात काय काय आहे फ्रिजचं पाणी पितोयं का? मुंबईत जे-जे आमदार बोलले आहेत त्यांच्या घरी एकदा जाऊन यायचं, असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिलायं.

शिंदे सरकारची शिंदेशाही; विरोधात काम केल्यास ‘लाडकी बहीण’मधून नाव डिलिट, आमदाराची धमकी

मराठ्यांची आता दोन कामे आहेत, एक निवडणूक लढवायची अन् दुसरं एकदा मुंबईत चक्कर मारुन यायची. देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी शहाणं व्हावं, मराठे एकत्र आले की इतिहास घडतो. फडणवीस आणि छगन भुजबळाला राज्यात दंगली घडवायच्या आहेत. ही जबाबदारी आता मराठ्यांच्या खांद्यावर आहे. फडणवीस आणि भुजबळाला काहीतरी कुरापती काढून दंगली राज्यात घडवायच्या आहेत. यांचं हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

छगन भुजबळ दुसऱ्यांच्या बाजाखालून निघत असतो. फडणवीस म्हणेल तसं भुजबळाने नाही ऐकलं तर तो बेसन भाकर खाण्यासाठीच जाणार आहे. भुजबळाचं असं झालंय, नाही बोलावं तर आत टाकतील बोलावं मराठे आहेतच, भुजबळाची बोलायची इच्छा नाही पण फडणवीस बोलालयाच लावत असल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी केलायं.

follow us