Download App

पालिका निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार ! प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर

या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय. या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे राजकीय फटाकेही दिवाळीनंतरच फुटणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Municipal Corporation Election : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केलीय. या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालाय. या कार्यक्रमानुसार या निवडणुकीचे राजकीय फटाकेही दिवाळीनंतरच फुटणार आहेत. (Municipal Corporation Election)

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे सर्व संस्थांवर प्रशासकराज होते. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी सुरू होती. गेल्या आठवड्यात प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु त्यात आता सुधारित प्रभाग रचनेची वेळापत्रक जाहीर झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेसाठी प्रभाग रचना वेळापत्रक

मुंबई महानगरपालिकेसाठी वेगळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रगणक गटाची मांडणीनंतर स्थळ पाहणी हे 4 जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. तर प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे त्यावर हरकती व सूचना मागण्यासाठी 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट असा कालावधी असणार आहे. तर 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे. तर 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचना अँतिम करून नगरविकास विभागास सादर करणे. तर 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत अंतिम केलेला प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे. तर 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे आहे.

राज्यातील अ, ब, क या दर्जाच्या महानगरपालिकेच्या प्रभाग रचनचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 11 जून ते 06 ऑक्टोबर कालावधीत प्रभाग रचना अंतिम करायच्या आहेत.


ड वर्गाच्या महानगरपालिकांसाठी वेगळा कार्यक्रम वेळापत्रक

राज्यातील मुंबई, अ, ब, क महानगरपालिकांसाठी एकच वेळापत्रक आहे. तर ड प्रवर्गातील महानगरपालिकांसाठी वेगळे वेळापत्रक आहे. 11 जून ते 13 ऑक्टोबर या कालावधीत प्रभाग रचना पूर्ण करायची आहे. त्यात 3 सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती व सूचना घ्यायचा आहे. तर 9 ते ऑक्टोबर 13 ऑक्टोबर या कालावधीत प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करायची आहे.


दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार

22 ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे. तोपर्यंत प्रभाग रचना पूर्ण होणार आहे. त्यानंतर निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक होऊ शकते.

follow us