Download App

Pravin Darekar : ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’, होर्डिंग लागल्यावर आपण कोठे होतात?

Pravin Darekar on Udhav Thackery : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर रविवारी नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे.

रविवारच्या या सभेमध्ये देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका केली. यामध्ये भाजपवाले मशीदित कव्वाली ऐकतात असा आरोप ठाकरेंनी भाजपवर केला होता. यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आपण काँग्रेस सोबत गेल्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे असे होर्डिंग लागल्यावर आपण कोठे होतात? त्याचबरोबर तुमच्या पक्षाच्या वतीने अजान स्पर्धा घेतल्या तेव्हा तुम्ही कुठे होतात? असा सवाल दरेकरांनी केला आहे. त्याचबरोबर यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या सर्वच आरोपांना भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पुढची काय गणितं आहेत माहीत नाही; श्रद्धांजली सभेत गौरव बापटांचे सूचक विधान!

वज्रमुठ सभेत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय उत्तर देणार आहे, अशी सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर करत उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये हल्लाबोल केला.

हिंडेनबर्ग अहवालामुळे देशातील एका खोट्या उद्योगपतीचा बुरखा फाटला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे त्याला वाचवत आहे. हिंडेंनबर्ग परदेशी आहे त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा असे मोदी-शाह सांगत आहे. पण, सत्यपाल मलिक हे तुमचेच कार्यकर्ते आहेत. राज्यपाल आहेत. मग, मलिक यांनी पुलवामाबाबत केलेल्या आरोपांवर तरी तोंड उचकटा, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात बाप चोरणाऱ्या औलादीना घेऊन सरकार स्थापन करणारे भाजप हे इतरांना नैतिकतेचे डोस पाजत आहे. परंतु, स्वतःचे सगळी कृत्य मात्र रावणाची करत आहे. या फडतूस, नेभळट आणि कर्तृत्वहीन भाजप-शिंदे सरकार घरी पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

Tags

follow us