Prithviraj Chavan accuses BJP after landslide on the ‘Missing Link’ : महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. (BJP) मुंबई आणि जवळच्या शहरातही पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळून सुमारे 18 तास वाहतूक बंद राहिली होती. यावरून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मिसिंग लिंकचा विषय मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. महायुती सरकारने धाडस दाखवले म्हणूनच हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला. मात्र यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिसिंग लिंकला त्यांनी का स्थगिती दिली? त्याचबरोबर भाजपच्या कमिशनच्या धोरणावरून टीका केली.
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यात या मिसिंक लिंगसाठी ट्रक्चरल इंजीनिअर्सने देखील चांगल काम केलं. जेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं तेव्हा मात्र या रस्त्याच्या किंमती 50 टक्क्यांनी वाढल्या. त्यात महाराष्ट्रात भाजप सरकारच्या काळात 40 टक्के कमिशन घेण्याची प्रथा जी पडलेली आहे. त्यात सिमेंट, वाळू या सर्वात जो काही भ्रष्टाचार झाला. त्याचा तपास कोणी केला का? आमचं सरकार आल्यावर तो तपास आम्ही करूच
FIFA World Cup 2026 ‘गोल्डन बूट’ साठी जोरदार लढत, मेस्सी की एमबाप्पे कोण मारणार बाजी?
जर आमदार खरेदी करण्यासाठी 40-50 खोक्यांचा विषय जो महाराष्ट्रात चर्चेला येतो. त्यासाठी पैसे कुठून येतात? हे सर्व पैसे रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधून येतात. म्हणूनच तुम्हाला समृद्धी महामार्ग हवा होता आणि आता शक्तिपीठ मार्ग हवा आहे. यातून हा धोका निर्माण होऊ शकतो की, जर डिझाईन प्रमाणे काम झालं नाही तर जर तुम्हा डोंगरांचे कोपरे तोडले तर चिंतेचा विषय आहे. आता जे घडतयं ते त्याबद्दल चिंता वाटण्यासारखचं आहे.
फडणवीस वैफल्यग्रस्त; राज्याला सुसंस्कृत मुख्यमंत्र्याची गरज; संस्कार काढत राऊत गरजले
ज्या प्रमाणे कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि पे सीएमच्या घोषणेवरच गेलं आहे. त्यामुळे मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांची गरज आहे. डिझाईन चांगलं आहे. प्रकल्प झाला सरकारचं अभिनंदन मात्र जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना सरकारी अधिकाऱ्यांपासून ते थेट खाली प्यूनपर्यंत काय-काय होतं हे सर्वांना माहिती आहे. तेच या पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्यांतून आणि कोसळलेल्या दरडिंमधून दिसून आलं आहे. याचीच मला चिंता आहे.
मिसिंग लिंकला त्यांनी का स्थगिती दिली?
मिसिंग लिंक बाबत लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. मिसिंग लिंकचं काम आम्ही होऊ दिलं नाही. अशी चर्चा सुरू आहे पण हा प्रकल्पाच आम्ही आणला मग तो का होऊ दिला नसता. या प्रकल्पाला स्थगिती देण्यामागे कारणं असे होते की, त्याचे कॅल्युलेशन्स पुन्हा करा, सेफ्टी चेक आणि आणखी अभ्यास करा. धोका नाही याची खात्री करा. याचा खर्च आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता तर फक्त चिंता होती की देशात अजून असा प्रकल्प झाला नव्हता. असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंकला त्यांनी का स्थगिती दिली? मिसिंग लिंकच्या कामावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
