Download App

Sanjay Raut News : या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात ठेवले; सत्तेवर आल्यावर परतफेड करणारच !

नाशिक – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. ‘या सरकारने मला ११० दिवस तुरुंगात टाकले पण, मी आजिबात खचलो नाही. या बाळासाहेबांच्या शिवसेने मला दिल्लीपर्यंत नेलं त्या शिवसेनेसाठी माझ्या आयुष्यातले ११० दिवस आहेत. २०२४ ला सत्तेवर येईल तेव्हा याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, की ‘तुरुंगात हसत गेलो भगवा फडकवत आणि बाहेरही भगवा फडकवतच आलो. कुधीतरी सांगेल की तुरुगांत कसा राहिलो, आमच्याबरोबर काय घडले ते कधीतरी सांगेल.सध्या त्यांच्याकडून माणसे फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एजंट नेमले गेले आहेत. प्रत्येकाची किंमत ठरविली जात आहे.’

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाचा एवढा बेफाम वापर कधीही कुणीच पाहिला नाही. ग्रामसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदार, या पदांचं एक रेटकार्ड लावल आहे. कमिशन एजंट नेमले आहेत. हे गावा-गावात फिरत आहेत. माणसं विकत घेतली जात आहेत. सत्तेतल्या भागीदारांची ही परिस्थिती आहे,’ असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याच्या फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली.

 

 

Tags

follow us