Sanjay Raut : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) सध्या दिल्लीत सुरु आहे. या संमलेनातील ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात बोतलांना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मोठा आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत (UBT) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक विधान केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे (Usha Tambe) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.
IND vs PAK : पाकिस्तान बॅकफूटवर! एकामागोमाग तीन धक्के; भारताने लावली विकेट्सची रांग
टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला, साहित्य संमेलन हे राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय?, असा सवालही राऊतांनी केला.
उषा तांबे यांना खुले पत्र!
@PawarSpeaks
@supriya_sule
@samant_uday
@rajivkhandekar pic.twitter.com/SjUz8bBvod— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2025
राऊत पत्रात नेमकं काय म्हणाले?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (98 वे) दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात झालेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन आणि त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य मंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय वापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले, त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?, असा सवालही राऊतांनी केला.
भारतातील नऊ शहरे सर्वात स्वस्त, महागड्या शहरांत पहिलं कोण?, वाचा अहवाल
संमेलनाचा वापर राजकीय चिखलफेकीसाठी
पुढं लिहिलं की, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, अशी मागणी राऊतांनी केली.
साहित्य महामंडळ विकले गेले…
नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले. हे खरे की खोटे माहित नाही, पण, महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळं धक्का बसलाय. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे, असंही राऊत म्हणाले.