Download App

Chhatrapati Sambhajinagar : निवडणुका पुढे ढकल्यासाठी भाजप दंगली घडवतयं, संजय राऊतांचा आरोप

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेनंतर भाजपने ही दंगल राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याच्या मुलाने घडवून आणल्याचा आरोप केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, दंगलखोर कोण होते आणि या देशात कोण दंगल घडवतय हे सर्वांना माहीत आहे. हुबळी, हावडा, महाराष्ट्रात दंगल कोण घडवतयं? भाजपने नवीव विंग निर्माण केली आहे. फक्त दंगली घडवायच्या. 2024 पर्यंत हा देश दंगलीमध्ये होरपळून टाकायचा. मग निवडणुका घ्यायच्या किंवा निवडणुका पुढे ढकलायचा हे भाजपचं धोरणं आहे. पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीच्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर देत टिकास्त्र सोडले.

त्याचबरोबर यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची पदवी पवण्याचं काय कारण? गृहमंत्री अमित शाह यांनी समोर आणली होती. पण त्यावर अनेक लोकांनी शंका घेतली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदवीबद्दल सांगावे. काही दिवसांपूर्वी, गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या तपशीलाची मागणी केल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. ही कोणती पद्धत, पदवी पवण्याचं काय कारण? असा सवाल देकील उपस्थित केला होता.

छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीत पीएफआय कनेक्शन? दंगलीतील आत्तापर्यंत 28 जण अटकेत

खरं तर पंतप्रधान मोदी यांची पदवी नव्या संसदेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावी. पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी सामनामध्ये पंतप्रधान मोदींच्या पदवीविषयी उपस्थित केलेल्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

त्याअगोदर महाविकास आघाडीची रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभा झाली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाविद्यालयीन पदवी वादावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Tags

follow us