Download App

सुरेश जैन यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेश जैन यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेताला

Image Credit: Letsupp

Resignation of Suresh Jain : जळगावच्या राजकारणातील मोठे नेते सुरेश जैन यांनी शिवसेना उबाठा गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Loksabha Election) लोकसभा निवडणुका सुरू असतानाच जैन (Suresh Jain ) यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात जैन (Shiv Sena UBT) आता काय निर्णय घेतात याबाबात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सुरेश जैन हे भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. परंतु, आपण राजकारणातून बाहेर पडणार आहोत असा मोठा निर्णय जैन यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडी भ्रष्टाचारीच, अमित शाहांनी १० वर्षांचा हिशोबच दिला

कोणत्याही पक्षात जाणार नाहीत

सुरेश जैन यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते कुठल्या पक्षात जाणार याबाबत मोठी चर्चा सुरू झाली असतानाच आता जैन यांनी आपण सक्रीय राजकारणातून बाहेर पडणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचं लेखी पत्र जैन यांनी प्रसिद्ध केलं आहे. एका वृत्तवाहिनीला बोलत असताना जैन म्हणाले आता वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचंही जैन म्हणाले आहेत. तसंच, यापुढे जो चांगलं काम करील त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. मात्र, आपण कोमत्याही पक्षात जाणार नाहीत असंही जैन यांनी स्पष्ट केलं आहे.

 

सर्वच पक्षाकडून फोटोचा वापर

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत माझे फोटो सर्वच पक्ष वापरत आहेत. यामुळे मी कुणाच्या बाजूने आहे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण आता राजकारण सोडून देणार आहोत असंही जैन यावेळी म्हणाले आहेत. तसंच, कुठल्या पक्षात जाण्याचा किंवा काम करण्याचा आपला विचार नाही असंही जैन यावेळी म्हणाले आहेत.

 

जळगावात ठाकरेंना धक्का; माजी मंत्री सुरेश जैन भाजपच्या वाटेवर?

सुरेश जैन यांची राजकीय कारकीर्द

माजी मंत्री सुरेश जैन हे 1980 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर जळगाव नगरपालिकेत त्यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केलं. त्यात त्यांना यश मिळाले आणि जळगावचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. 1985 मध्ये ते समाजवादी काँग्रेसतर्फे आमदार झाले. 1990 मध्ये सरतचंद्र सिन्हा समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आले. 1995 मध्ये काँग्रेसतर्फे तर 1999 मध्ये ते शिवसेनेतर्फे आमदार झाले. 2004 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते आमदार झाले. 2009 साली शिवसेनेतर्फे जळगाव विधानसभेतून आमदार झाले. 1980 पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते सलग 34 वर्षे आमदार होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदही दिलं होतं.

follow us

वेब स्टोरीज