Download App

भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा…; तत्कालीन मंत्र्याची यादी देत सुळेंचा फडणवीसांना टोला

  • Written By: Last Updated:

Supriya Sule : राज्यातील कंत्राटी पोलीस भरतीवरून (Contract recruitment) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. कंत्राटी भरतीचे काम 100 टक्के काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, अशी टीका त्यांनी केली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Khichdi 2: कीर्ती कुल्हारी अन् जेडी मजेठिया सांगितला ‘खिचडी 2’ सिनेमातील गाण्याचा अनुभव 

कंत्राटी भरतीप्रकरणी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलं की, भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असं ओरडत भाजपने ढोंगीपणा कून जनतेची दिशाभूल करणं अगोदर बंद करावं. कॉंग्रेस राष्ट्रवदी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीच कंत्राटी पद्धतीने कार्यकारी पदे भरली नाहीत. कंत्राटी पद्धत कोणी सुरू केली याचा भाजपने शोध घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे . उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती, असा टोला त्यांनी लगावला.

कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजप वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा, असं म्हणत सुळेंनी मंत्र्यांची एक यादीच दिली आहे.

२०११ सालातील मंत्री
1. विजयकुमार गावीत,
2. राधाकृष्ण विखे पाटील,
3. अजित पवार,
4. नारायण राणे,
5. दिलीप वळसे पाटील,
6.छगन भुजबळ,
7. सुनील तटकरे,
8. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री ..
1. एकनाथ शिंदे
2. अजित पवार,
3. दिलीप वळसे पाटील,
4. छगन भुजबळ,
5. उदय सामंत,
6. धनंजय मुंडे,
7. शंभूराज देसाई,
8. गुलाबराव पाटील,
9. दादा भुसे,
10. संजय राठोड,
11. संदीपान भुमरे,
12 अब्दुल सत्तार,
13. संजय बनसोडे,
14. आदिती तटकरे

Tags

follow us