Download App

भाजपला दाढीवाला खोड कीडा आणि बोंडावर गुलाबी आळी; उद्धव ठाकरेंचा अजितदादांवरही निशाणा

ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray Dasara Melav: शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी ( Narendra Modi), अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शाह तुमच्या पक्षाला दाढीवाला खोड कीडा लागला आणि बोंडावर गुलाबी आळी अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका केली आहे.

सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे मंदीर उभारणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला. दहा दिवसांपूर्वी नागपूरला गेलो होते. मी शहरीबाबू आहे. पण गोरगरीबांना दहा रुपयात जेवण दिले आहे. नागपूरला मी गेलो होतो. मला शेतीमधील कळत नाही. पण शेतकऱ्यांचे अश्रू दिसतात. सोयाबीनला भाव नाही. बँका कर्ज देत नाही. संत्र्यांवर खोडकिडा पडला आहे. कापसाच्या बोंडावर गुलाबी आळी आली आहे. अमित शाह तुमच्या पक्षाला दाढीवाला खोड कीडा लागला आहे. तुमच्या बोंडावर गुलाबी आळी लागलीय. तुमच्या डोळ्यात देखत पोखरला जात आहे. काही सोयरसुतक नाही. सत्ताजिहाद पाहिजे फक्त कुणी बरोबर असो.

ठाकरे भाषणात काय म्हणाले-

ही लढाई सोपी नाही. एका बाजूला सर्व बलाढ्य आहेत. केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा आहे. तेव्हा स्वाऱ्या येत. तेव्हा गावांचे गावे नेस्तनाभूत करत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनाला नेस्तनाभूत करा. पण दरवर्षी शिवसेनाला नवीन अंकुर फुटत असतात. भगव्या मशाली झाल्या आहेत. प्रत्येक शिवसैनिक आहे. बाळासाहेबांची मशाल बनवून भ्रष्टाचाराला गाडवून टाकायचे आहे. तुमच्यामुळे मी उभा आहे. त्यांच्या किती पिढ्या येणार आहेत. भाजप वाढवणं हे आमचे पाप आहे. आम्ही यांना डोक्यावर बसवलं पण आता मला भाजपला खांदा द्यायचा आहे, असे म्हणत आपल्याला उखडून फेकण्यासाठी कितीही पिढ्या येऊ देत, या सर्वांच्या उरावर बसून मी भगवा फडकवणार आहे.

टाटांसारखे उद्योगपती वेगळे आहेत. टाटा यांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत. टाटांनी मीठ दिले आहे. आताचे उद्योगपती मिठागरे गिळत आहेत. मिठागरे गिळणारे जात का नाही, असे वाटते. जे नको आहेत, ते जात आहेत. भाजपला लाथ मारायची आहे. लोकशाहीच्या युद्धाला सुरवात करायची आहे

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा मंदिर बांधणार शिवाय राहणार नाही. जसे आम्ही जय श्रीराम म्हणतो. तसे आम्ही जय शिवराय म्हणतो. राज्यामध्ये शिवरायांचे मंदिर उभारले जाणार आहे. मोदी आणि तुमच्या मिंध्यांना शिवाजी महाराज मतपत्रिकेचे यंत्र वाटत असेल.

आताचा भाजप हायब्रीड झाला आहे. भारतीय जनता पक्षाची लाज वाटली पाहिजे. सर्व गद्दारांना, चोरांना घेतले आहे. चोरांना डोक्यावर बसवायचे आहे.

देशी गाय वाचविल्या पाहिजेत. पण कोवळा मुलीवर अत्याचार होत आहेत. तो हंबरडा तुमच्या कानावर जात नाही. आधी आईला वाचवा आणि नंतर गायीला.

follow us