Download App

‘…तर सरकार अदाणीच्या शेअरबद्दल का बोलत नाही, Prakash Ambedkar यांचा सवाल !

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारचं (Modi Govt) कौतुक केल होतं. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांना योग्य म्हणत आंबेडकरांनी मोदींना पाठिंबा दर्शविला होता. मात्र आज त्यांनी बजेटवरून (budget) आणि देशातील महागाईवरून मोदी सरकारवर सडेतोड भूमिका बजावली. अर्थसंकल्पात सर्वात महत्वाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या तिजोरीत किती पैसे येणार आहे. हे बघता येणारे उत्पन्न २७ लाख कोटी आहे. जो शासनाचा खर्च आहे तो ४५ लाख ३ हजार ८७ लाख कोटी इतका आहे. यामुळे ही १८ लाख कोटींची आहे. यामुळे पैशाची कमतरता ही ५० टक्के राहणे सक्षम अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सांगितलं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्योजक अदानी यांचे शेअर्स संपूर्ण पडत असून याविषयी हे शासन काही बोलत नाही. बाजारातून १८ कोटी रुपये सरकारने उचलले तर उद्योग आणि विकासासाठी कुठून पैसा शिल्लक राहणार हे शासनाने स्पष्ट करावे. मध्यम वर्गाचे उत्पन्न वाढवू असे त्यांनी गेल्या वेळी सांगितले, परंतु त्यात कोणत्याही प्रकारचे बदल त्यांनी केले नाही. कोविड काळात लोकांची आर्थिक स्थिती बिघडली होती. मध्यम वर्गाच्या गरजा भागवल्याने ते खर्च अधिक करणार आणि शासनाचे उत्पन्न वाढेल असे सरकारला वाटत आहे. देशात चीनकडून काही शिकला नाही असे दिसत आहे. चीनमध्ये नोकरदार यांना वर्षातून एक ऐवजी ४ वेळा बोनस दिला जातोय, परंतु लोकांनी केवळ १० टक्के खर्च केले आणि उर्वरित पैसे हे बँकेत मुदत ठेव मध्ये ठेवले जात आहे. केंद्र सरकारला असे वाटते की, लोक खर्च करतील आणि उत्पन्न वाढणार, परंतु यापुढे बँकेत मुदत ठेव वाढलेल्या दिसणार आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे लोक गरिब आहेत, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काही करण्यात आले नाही. मनरेगा मधील गुंतवणूक सरकारने कमी केल्याने अगोदर जे १०० दिवस काम मिळत होते, ते ४० दिवसावर आल्याने लोकांमध्ये आता असंतोषता पसरणार आहे. परदेशी गुंतवणूकदार हे आपले पैसे काढत आहे. यामुळे शासनाला अर्थसंकल्प चालविण्यासाठी आवश्यक निधी लागतो, तो तरी उपलब्ध होणार का ? अशी सवाल केला. सरकार विरोधात लोकांची मानसिकता वाढत आहे. आमचे आणि शिवसेना यांचे युती दृष्टीने ठरले आहे.

​​​​महाविकास आघाडीविषयी अद्याप शिवसेनाने आम्हाला काही सांगितलं नाही. मुंबई मनपात आघाडी करण्याच्या दृष्टीने आमचे शिवसेनेशी बोलणे सुरू आहे. शिवसेनेने कसबा आणि चिंचवड निवडणूक लढणार असल्याचे घोषित केल्यावर आमचा त्यांच्या उमेदवारास पाठिंबा राहणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे आम्ही फरफटत जाणार नाही. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, दुर्देवाने काँग्रेस पक्षाने अर्थसंकल्पवार जे भाष्य केले आहे. यातून त्यांनी मौन बाळगले असल्याचे दिसत आहे. आपण श्रीलंकाच्या मार्गावर जात आहोत का ? असे वातावरण सध्या निर्माण होत आहे. याविषयी अर्थतज्ञ यांनी खरी भूमिका नागरिकांना समजावून सांगितली पाहिजे. असे मत आंबेडकर व्यक्त केले.

Tags

follow us