Download App

विराटच्या विजयी आरसीबी बंगळुरूमध्ये दाखल पण ओपन बस परेड रद्द! कारणही आलं समोर…

RCB ची बंगळुरूमधील ओपन बस परेड रद्द!ट्राफिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली.

Open bus parade of IPL Trophy winner RCB in Bengaluru cancelled Reason revealed : अखेर 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत विजय मिळवला. दरम्यान, गेली 18 वर्षांपासून खेळणारा विराट आज टीम विजयापर्यंत आल्यानंतर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटी, ट्रॉफी जिंकण्याचं विराटच स्वप्न पूर्ण झालं. त्यानंतर विजयी टीम बेंगळुरू शहरामध्ये पोहचली आहे. मात्र त्यांची विजयानंतरची ओपन बस परेड रद्द करण्यात आली आहे. ही परेड रद्द होण्यामागील कारण देखील समोर आलं आहे.

या कारणामुळे ओपन बस परेड रद्द!

17 वर्षांची प्रतिक्षा संपवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) आयपीएलच्या 18 व्या मोसामतील चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर विजयी टीम बेंगळुरू शहरामध्ये पोहचली आहे. मात्र त्यांची विजयानंतरची ओपन बस परेड रद्द करण्यात आली आहे. पोलिसांनी या परेडला परवानगी दिलेली नाही. कारण शहरामधअये या परेडमुळे ट्राफिक निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणामुळे ही परेड रद्द करण्यात आली आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे हे बाजीरावसारखे अजय योद्धे, करुणा शर्मा-मुंडे असं का म्हणाल्या?

मात्र या टीमचं सध्या सर्वत्र स्वागत आणि कौतुक सुरू असलं तरी टीमचा पहिला सत्कार मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्यांकडून सत्कार केला जाणार आहे. दुपारी 4 वाजता विधानभवनात हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ही विजयी टीम सेलिब्रेशन करणार आहे. दरम्यान सध्या विधानभवान परिसरात विराज आणि आरसीबीच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे.

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा

आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या. आरसीबीने अशाप्रकारे चौथ्या प्रयत्नात फायनलमध्ये विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर विराट भावूक झाला. विराटला भावना अनावर झाल्या. तर दुसऱ्या बाजूला पंजाबची आयपीएल फायनलमध्ये पराभूत होण्याची 2014 नंतरची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली.

‘निवृत्तीनंतर न्यायाधीशांनी सरकारी नोकरी अन् राजकारण…’ सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्याने टेन्शन वाढलं

पंजाबची विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या सलामी जोडीने 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर प्रियांश आर्या 24 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंह याने 26 करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आरसीबीने पंजाबला ठराविक अंतराने झटके देत शेवटपर्यंत सामन्यावरील पकड कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.

नगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी; प्रशासनातर्फे दक्षतेचे आवाहन

पंजाबसाठी शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शशांकने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. शशांकाने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 61 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. मात्र त्यांचं हे योगदान आरसीबीला चॅम्पियन होण्यापासून रोखू शकलं नाही.

follow us