176 धावांचं आव्हान
टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. भारतासाठी इशान किशन याने सर्वाधिक 77 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवम दुबे याने 27 तर तिलक वर्मा याने 25 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानसाठी सॅम अयुब याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
ड टु हेड रेकॉर्ड्स
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला एकमेव सामना जिंकता आला आहे. तर एकूणच टी 20i क्रिकेटमध्ये दोन्ही संघात एकूण 16 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 3 सामनेच जिंकता आले आहेत.
1 विरुद्ध 6
टीम इंडिया आणि पाकिस्तान हा सामना 1 विरुद्ध 6 अशी लढत आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
टीम इंडियाचा ‘दस का दम
टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले आहेत. भारताने नामिबिया आणि त्याआधी यूएसएवर मात केली आहे. तर भारताने टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले होते.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानचे 11 खेळाडू : सलमान आगा (कॅप्टन), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारीक.
