Download App

शुभमन गिलला कमांड अन्… टीम इंडियामध्ये फूट? सर जडेजाने व्यक्त केली थेट कर्णधार होण्याची इच्छा

Ravindra Jadeja On Indian Captaincy : भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध (INDvsENG) पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Ravindra Jadeja On Indian Captaincy : भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध (INDvsENG) पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड दौऱ्यासाठी नुकतंच भारतीय संघाची घोषणा देखील केली आहे. या दौऱ्यावर भारताची कमान शुभमन गिलकडे (Shubman Gill) देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता संघाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) एक मुलाखात व्हायरल झाली आहे. या मुलाखतीमध्ये जडेजाने क्रिकेटला निरोप देण्यापूर्वी एकदा कसोटीमध्ये भारताचा कर्णधार व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

आर अश्विनच्या (R. Ashwin) यूट्यूब चॅनलवर बोलताना त्याने कर्णधारपदाची इच्छा व्यक्त केली आहे. अश्विनने रॅपिड फायरमध्ये जडेजाला विचारले की निवृत्ती घेण्यापूर्वी त्याला कोणती गोष्ट साध्य करायची आहे. ज्याच्या उत्तरात जडेजाने सांगितले की तो भारतीय कसोटी संघाचे कर्णधार होऊ इच्छितो. तो म्हणतो की त्याच्या दीर्घ कारकिर्दीत वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळून त्याने कर्णधार पदाची भूमिका चांगली समजून घेतली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर भारतीय संघात कर्णधार पदावरुन फूट निर्माण होत आहे का? असा प्रश्नउपस्थित करण्यात येत आहे.

रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कसोटीमध्ये भारताचा नवा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भविष्याचा विचारकरुन बीसीसीआयने शुभमन गिलकडे भारताचे नेतृत्व सोपविले आहे. तर ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) उपकर्णधार पद देण्यात आले आहे. कसोटीमध्ये कर्णधार पदासाठी रवींद्र जडेजासह ऋषभ पंत, केएल राहुलचे नाव देखील शर्यतीत होते मात्र बीसीसीआय शुभमन गिलकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे.

या मुलाखतीमध्ये अश्विनने जडेजाला भारताचा कसोटी कर्णधार व्हायचे आहे का असे विचारले तेव्हा जडेजाने म्हटले, हो, नक्कीच. गेल्या काही वर्षांत मी वेगवेगळ्या कर्णधारांसोबत खेळलो आहे. मला प्रत्येक कर्णधाराची शैली माहिती आहे आणि खेळाडू काय विचार करतात आणि काय हवे आहे हे देखील मला समजते. प्रत्येक कर्णधाराची स्वतःची शैली असते. मी धोनीच्या नेतृत्वाखाली प्रत्येक स्वरूपात खेळलो आणि त्याची विचारसरणी खूप सोपी आहे. जर त्याला वाटत असेल की एखादा फलंदाज त्याच ठिकाणी शॉट खेळू शकतो, तर तो नक्कीच तिथे एक क्षेत्ररक्षक ठेवेल.

जडेजा असेही म्हणाला की कसोटी संघापेक्षा टी-20 मध्ये कमांडिंग अधिक कठीण आहे. कसोटी क्रिकेटमध्ये, तुम्हाला गोलंदाजाच्या गरजेनुसार दोन किंवा तीन क्षेत्ररक्षक बदलावे लागतात, फलंदाजानुसार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद वेगळे असते. त्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. हे आयपीएल किंवा टी-20 इतके गुंतागुंतीचे नाही, जिथे प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो.

यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’चा धमाकेदार टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

रोहितच्या निवृत्तीनंतर, अश्विनने जडेजाला कर्णधार बनवण्याचे समर्थन केले. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले होते की, आपण रवींद्र जडेजा का विसरतो? जर नवीन कर्णधाराची आवश्यकता असेल, तर मी म्हणेन की दोन वर्षे अनुभवी खेळाडूकडे कमांड सोपवल्यानंतर, कमांड नवीन खेळाडूकडे सोपवायला हवी.

follow us