Download App

बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?; भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानात दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा

खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

T20 World Cup Pakistan lost by India case filed of sedition against team : टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) खराब कामगिरीमुळे पाकिस्तान (Pakistan ) क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि भारतासोबत (India) च्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवामुळे माजी खेळाडूंसह पाकिस्तान क्रिकेट चहा त्यांनी टीमवर जोरदार टीका केली.

बोट आढळलेली ‘ते’ आईस्क्रिम पुण्यात तयार झाले? धक्कादायक माहिती आली समोर

सामन्यांमधील या अडचणी काही कमी होत्या म्हणून आता कर्णधार बाबराझमसह पूर्ण टीम जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की भारतासोबत झालेला सामना हरल्यामुळे पाकिस्तानमध्ये एका वकिलाने या सर्व खेळाडूं सह कोच आणि स्टाफ विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानातील गुजरांवाला शहरामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या वकिलाने टीमवर गंभीर आरोप करत. अमेरिका आणि भारताविरुद्धच्या सामन्यातील पाकिस्तानच्या पराभवाने आपल्याला अत्यंत दुःख झाल्याचे सांगितलं.

Sarfira Trailer: साऊथच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ‘खिलाडी कुमार’ सज्ज; ‘या’ दिवशी होणार रिलीज

एवढंच नाही तर या वकिलाकडून पाकिस्तानच्या पराभवाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. तसेच ही चौकशी होईपर्यंत पाकिस्तानच्या संपूर्ण क्रिकेट टीमवर बहिष्कार टाकण्यात यावा. अशी देखील मागणी या वकिलाकडून करण्यात आली आहे. ही याचिका मंजूर झाली असून त्यामुळे t20 वर्ल्ड कप नंतर पाकिस्तान क्रिकेट टीम जेलमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जातआ आहे.

दरम्यान टीम इंडियाकडून लाजिरवाणा (Team India) पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघावर जबरदस्त कारवाई होणार हे निश्चित झालं आहे. विश्वचषकात सलग दोन पराभव स्वीकारलेल्या पाकिस्तान संघावर आता सुपर 8 मध्ये पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार बाबर आझमसह तीन खेळाडूंना धक्का देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

follow us

वेब स्टोरीज