‘Aakhiri Sawal’ to be specially telecast at Rashtrapati Bhavan : यूएईमध्ये बंदी, चित्रपट थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल… पण भारतात संजय दत्त अभिनीत ‘आखिरी सवाल’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकतेच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले होते, तर आता आज राष्ट्रपती भवनातही या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.
एका बाजूला चित्रपटाभोवतीचे वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सामान्य प्रेक्षकांपासून मोठ्या राजकीय आणि शासकीय व्यक्तींपर्यंत सर्वजण हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचत आहेत. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ‘आखिरी सवाल’मध्ये नेमकं असं काय आहे, जे पाहिल्यानंतर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया देण्यास भाग पडत आहे? यूएईमध्ये बंदी आणि चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतरही भारतात मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद हे दर्शवतो की हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाज आणि सामान्य माणसाशी थेट जोडलेला एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो.
शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
‘आखिरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वरंग यांनी केले आहे. चित्रपटाचे सादरीकरण निखिल नंदा यांनी केले असून निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली आहे. सहनिर्माते म्हणून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांची साथ लाभली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट 15 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
