Download App

वरळी हीट अँड रन प्रकरणात ‘या’ दिग्गज मराठी अभिनेत्याने गमावली सख्खी पुतणी

Worli Hit And Run Case मध्ये मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्यावर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Actor Jayvant Wadkar lost Niece in Worli Hit And Run Case : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच वरळीत (Worli Hit And Run Case) रविवारी (7 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्यावर देखील दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते जयवंत वाडकर (Jayvant Wadkar) यांच्या सख्ख्या पुतणीने (Niece) या अपघातात आपले प्राण गमावले आहेत. या अपघातात मृत पावलेल्या कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणी होत्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला.

Ayushmann Khurrana चं हृदयाला भिडणारं गाणं रिलीज; ‘रह जा’ ने केले रसिकांना मंत्रमुग्ध

या अपघातात कार चालक पळून गेला होता. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपासादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली आहे. राजेश शाह हे आरोपी मिहिर शाहचे वडील आहेत. मिहीर हा अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार आहे.

रोहित पाटलांना प्रभाकर पाटलांचे आव्हान? तासगावात भिडणार दोन तगडे तरुण…

जयवंत वाडकर काय म्हणाले?

या अपघातात आपल्या पुतणीचे प्राण गेल्याचे समजल्यानंतर जयवंत वाडकर यांची आक्रमक प्रतिक्रिया समोर आली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, वरळी अपघातातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ही विकृती आहे. गाडीसमोर एखादी व्यक्ती येते. तिला फरफटत नेऊन गाडी तशीच सोडून पळून जाता. हे वेदनादायी आहे. कावेरी, माझी सख्खी पुतणी आहे. तिने सगळं कष्ट करून हे उभं केलं होतं. तिची गणेशोत्सवामध्ये आम्हाला खुप आठवण येईल.

मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा…

या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात वारंवार हीट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. धनदांडग्या आणि राजकारणी लोकांकडून पदाचा गैरवापर केला जात आहे. मात्र माझं सरकार हे सहन करणार नाही. सर्वसामान्यांचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हीट अँड रनची प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात यावी पिडीतांना न्याय मिळावा. यासाठी मी पोलिसांना निर्देश दिले आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी देखील सुरू आहे.

follow us