Download App

Karan Johar: ‘दीपिका-रणवीर’ रिलेशनशिप स्टेटमेंटवर ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याने दिले सडेतोड उत्तर

Koffee With Karan: करण जोहरचा (Karan Johar) शो ‘कॉफी विथ करण’चा (Koffee With Karan) आठवा सीझन सुरू आहे. या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचे पॉवरफुल कपल म्हणजेच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) दिसले. हा एपिसोड खूपच मजेदार होता पण दीपिकाच्या एका वक्तव्यावर तिला आणि रणवीरला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता करण जोहरने ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्याने सडेतोड उत्तर दिले आहे.


नुकतचं रिलीज झालेल्या नवीन एपिसोडमध्ये करणने सांगितले की, त्याला याबद्दल खूप वाईट वाटले आहे. दीपिकाने रणवीरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अनेकांना डेट केल्याचे सांगितले होते. यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आले आणि रणवीरवर अनेक मीम्सही बनवण्यात आले. नव्या एपिसोडमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर पाहुणे म्हणून आले होते. यामध्ये करणने त्या घटनेबद्दल सांगितले आहे. करणने दीपिका-रणवीर एपिसोडचे वर्णन सर्वात प्रामाणिक असल्याचे सांगितले आहे.

करण म्हणाला की, त्याला वाटते की आम्ही तिघेही आमच्या भावनांबद्दल उघडपणे पुढे आलो आणि त्यामुळे त्यांची खिल्लीही उडवली गेली आहे. त्यानंतर करण त्या एपिसोडबद्दल म्हणाला की, “मला वाटले की हा आमच्या सर्वोत्तम एपिसोडपैकी एक होता. तो खूप प्रामाणिक होता, तो खूप गोष्टीबाबत खुलासा केला आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल काय होते, हे तुम्हाला आधीच माहित आहे. तुम्ही तुमच्या घरी बघा, मला त्यांना एवढेच सांगायचे आहे. “मला त्यांना माझे मधले बोट दाखवायचे आहे.”

मलायकासोबत लग्न कधी करणार? करण जोहरच्या कार्यक्रमात अर्जुन कपूरने थेटच सांगितलं

त्या एपिसोडदरम्यान दीपिका आणि रणवीरने त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलले होते. दोघांचे नाते कसे सुरू झाले आणि रणवीरने दीपिकाला लग्नासाठी कसे प्रपोज केले याबद्दल स्पष्ट केले आहे.

दोघांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम लीला’ चित्रपटाच्या शूटिंगच्य दरम्यान घडली होती. त्यांच्या नात्याबद्दल बोलताना दीपिकाने सांगितले होते की, सुरुवातीला दोघांमध्ये कोणतीही कमिटमेंट नव्हती आणि त्यावेळी ती अनेक लोकांना भेटायची. पण ती मनापासून रणवीरच्या सोबत आहे हे तिला कळत होतं.

Tags

follow us

वेब स्टोरीज