India Russia Trade : रशियाकडून मुबलक प्रमाणात भारताकडून तेल खरेदी (India Russia Trade) केली जात आहे. रशिया युक्रेन युद्धात रशियावर (Russia Ukraine War) प्रतिबंध लादले गेले होते. याच काळात भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत रशियाच्या अर्थव्यवस्थेला सावरलं होतं. आता भारताने रशियाकडून कोळसा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवल्याची माहिती मिळाली आहे. मे महिन्यात कोळसा खरेदीत वाढ होऊन हा आकडा 13 लाख टनांपर्यंत पोहोचला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा उच्चांकी आहे. रशियाकडून भारताला चांगल्या दर्जाचा आणि स्वस्त कोळसा दिला जात असल्याने भारताने कोळसा खरेदी वाढवल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियन वृत्तपत्र Kommersant ने शुक्रवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. भारताची कोळसा खरेदी वाढत चालली आहे. रशिया भारताला अपेक्षेपेक्षा कमी दरात कोळसा देत (Russian Coal) आहे. यामुळे भारताच्या एकूण कोळसा आयातीत एकट्या रशियाचा वाटा 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आजमितीस इंडोनेशिया (Indonesia) हा भारताचा सर्वात मोठा कोळसा पुरवठादार देश आहे. मे महिन्यात भारताने इंडोनिशियाकडून 98 लाख टन कोळसा खरेदी केला होता. यानंतर आता केंद्र सरकार रशियाचा उच्च दर्जाचा कोळसा खरेदीत वाढ करत आहे.
बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?
कन्सल्टिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्म Bigmint च्या आकडेवारीचा हवाला देत रिपोर्टमध्ये म्हटले आहे की भारताच्या एकूण कोळसा आयातीत 10 टक्के वाढ झाली आहे. कोळसा आयात 1.74 कोटी टन इतकी आहे. जून 2024 नंतरा हा आकडा सर्वात जास्त आहे. नॅशनल क्रेडिट रेटिंग्समध्ये कॉर्पोरेट रेटिंग ग्रुप्सचे डायरेक्टर नरीमन ताइकेतायेव यांनी रशियन वृत्तपत्राला सांगितले की रशियन कोळशाचा चांगला दर्जा आणि इंडोनेशियाच्या कोळशापेक्षा कमी किंमत या दोन कारणांमुळे भारताने रशियाच्या कोळशाची खरेदी वाढवली आहे.
रशियाचे कोळसा पुरवठादार भारताला कमी किंमतीत कोळसा देत आहेत. भारताची भविष्यातील कोळशाची गरजही भागवू शकतात. रशियन मूल्य सूचकांक केंद्राचे निदेशक एवगेनी ग्रेचेव यांचे म्हणणे आहे की रशियन कोळसा पुरवठादारांनी सध्याच्या कराराच्या आत राहूनच आपल्या कोळसा निर्यातीत वाढ केली आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या कराराची गरज नव्हती.
भारतात मान्सून सुरू झाल्याने तेथे जलविद्यूत उत्पादनात वाढ होईल आणि यामुळे कोळशाच्या मागणीतही वाढ होईल. भारत आपल्या एकूण 70 टक्के वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशावर अवलंबून आहे. मार्च महिन्यात भारताने जवळपास 1.04 अब्ज टन कोळसा खरेदी केला होता. केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की 2030 पर्यंत उत्पादन जवळपास 1.53 अब्जांपर्यंत पोहोचेल.
Pakistan Bomb Attack: पाकिस्तानध्ये लष्करी ताफा टार्गेट, आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 सैनिक ठार