बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?

बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?

India Bangladesh Conflict : भारताने बांग्लादेशला आणखी एक धक्का (India Bangladesh Conflict) दिला आहे. बांग्लादेशातून येणारी जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जमीन मार्गाने होणाऱ्या या वस्तूंच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे. तरीही ही उत्पादने (Bangladesh Crisis) न्हावा शेवा बंदराच्या माध्यमातून भारतात आणता येतील. विदेश व्यापार महानिदेशालयाने (डीजीएफटी) यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

याआधी 17 मे रोजी भारताने बांग्लादेशातून येणारे रेडिमेड कपडे आणि प्रोसेस्ड फूड यांसारख्या वस्तूंवर काही प्रमाण निर्बंध टाकले होते. आता सरकारच्या या ताज्या निर्णयाचा फायदा देशातील जूट कारखाने आणि शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. कारण भारतात जूट उद्योग एक मोठा उद्योग आहे. डीजीएफटीने दिलेल्या माहितीनुसार आता काही खास जूट उत्पादने रस्ता वाहतूक मार्गे भारतात येणार नाहीत. जर या वस्तू न्हावा शेवा बंदराच्या माध्यमातून येत असतील तर मात्र कोणतीही बंदी नाही.

बांग्लादेशात पिक्चर हळूहळू बदलतोय.. युनूस यांची सत्ता धोक्यात; डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम!

कोणत्या उत्पादनांवर बंदी

भारत सरकारने ज्या उत्पादनांवर बंदी घातली आहे त्यात जूटपासून तयार केलेल्या वस्तू, जूटचा सिंगल दोरा, वळलेला दोरा, तयार कपडे, ब्लिच न केलेले जूटचे कपडे या वस्तूंचा समावेश आहे. जूट उत्पदनांच्या आयातीवर ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता या वस्तू रस्ते वाहतूक मार्गे भारतात आणताच येणार नाहीत. हा निर्णय का घेण्यात आला याची माहिती सरकारने दिलेली नाही. देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतल्याची चर्चा मात्र आहे.

भारताचा बांग्लादेशला मेसेज काय

भारतात जूटचा मोठा उद्योग आहे. बांग्लादेशातील स्वस्त जूट उत्पादनांची डंपिंग (कमी किंमतीत विक्री) भारतीय जूट मिल आणि शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे यात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशातील निर्यातदारांना मात्र फटका बसणार आहे. त्यांचे उत्पन्न आणि या व्यवहारातून मिळणारा नफा देखील घटणार आहे. भारताने मात्र देशांतर्गत जूट उद्योग आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात बांग्लादेशातील वस्तू आयातीवर बंदी घातली आहे.

बांग्लादेश, अफगाणिस्तान, धरण अन् फायटर जेट; भारताच्या कोंडीसाठी चीनचे 4 मोठे डाव..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube