समुद्राच्या मध्यभागी भारतीय मालवाहू जहाजावर पुन्हा हल्ला ! परराष्ट्र मंत्रालयाकडून थेट इशारा

Israel-Iran war-ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर (Indian ship) हल्ला झाला आहे. या जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित.

IRAN WAR INDIAN SHIP ATTACK OMAN

IRAN WAR INDIAN SHIP ATTACK OMAN

Israel-Iran war: इस्रायल-इराण युद्धाचा (Israel-Iran war) फटका भारताला बसत आहे. त्यातच आता भारतीय मालवाहू जहाजांवर हल्ले होऊ लागले आहेत. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर (Indian ship) हल्ला झाला आहे. या जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असून, ओमानच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली आहे.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकाराचा हल्ला चुकीचा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.


सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत

व्यापारी जहाजे आणि नागरी खलाशांना लक्ष्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. काल ओमानजवळ भारतीय जहाजावर झालेला हल्ला अस्वीकार्य आहे. आम्ही व्यापारी जहाजे आणि निष्पाप खलाशांवर होणाऱ्या वारंवारच्या हल्ल्यांचा निषेध करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
जहाजावरील सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. सरकारने म्हटले आहे की जहाजावरील सर्व भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि म्हटले, “सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या बचाव कार्याबद्दल आभार मानतो.

राजधानीत निर्भया’ची पुनरावृत्ती? वेळ विचारण्याच्या बहाण्याने महिलेला बसमध्ये ओढले, दोन तास चालत्या बसमध्ये अत्याचार

भारताने सागरी व्यापारी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा एकदा आवाहन केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, “व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, निष्पाप नागरी खलाशांना धोक्यात घालणे, किंवा नौकानयन आणि व्यापाराच्या स्वातंत्र्यात व्यत्यय आणणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे. सागरी सुरक्षेवर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे भारत सरकारने म्हटलंय.

मोठी बातमी! व्ही. डी. सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री


आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखावा

भारत जगातील एक प्रमुख व्यापारी देश आहे. त्याचा सुमारे 95 टक्के व्यापार सागरी मार्गांनी होतो. पेट्रोलियम, रसायने, अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक या मार्गांवर अवलंबून असते. कोणत्याही व्यत्ययाचा परिणाम केवळ भारतीय अर्थव्यवस्थेवरच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होतो. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेत सामील असलेल्या सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. सूत्रांनुसार, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल देखील या परिसरात कडक पाळत ठेवत आहेत. जहाजाची ओळख आणि हल्ल्याचे स्वरूप निश्चित करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, सर्व भारतीय जहाजांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Exit mobile version