Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) दरम्यान युती होणार असल्याची चर्चा जोराने सुरु आहे. राजकीय वर्तुळात या युतीबाबात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. याचत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) मेळाव्यात बोलताना जे जनतेच्या मनात आहे तेच होणार असं म्हटल्याने लवकरच मनसे आणि ठाकरे गटात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
तर दुसरीकडे आज (20 जून) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीत आपण मनसेसबोत जाण्यास सकारात्मक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक पातळीवर युतीबाबात आढावा घेऊन माहिती देण्याचे आदेश त्यांनी जिल्हाप्रमुखांना दिले असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणासोबत युती करायची आहे.याबाबात आढावा स्थानिक नेत्यांनी, संपर्कप्रमुखांनी आणि जिल्हाप्रमुखांनी घ्यावा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची देखील माहिती सध्या समोर आली आहे. तसेच आपण मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहोत मात्र स्थानिक पातळीवर या युतीबाबत वातावरण कसा आहे. याबाबत आढावा घेऊन येत्या एक महिन्यात माहिती देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीसोबत युती होणार की मनसेसोबत याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल असं देखील या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले असल्याची माहिती मिळाली आहे.
IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन
तसेच भाजपने आपली सर्व यंत्रणा चोरुली आणि मोठा पक्ष झाला. त्यामुळे आपली मुळ यंत्रणा पुन्हा सज्ज करा असं देखील आदेश जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच भाजप एक भाडोत्री पक्ष आहे. येणाऱ्या काळात हा पक्ष आपले आणखी काही पदाधिकारी फोडू शकतो असं देखील या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले.