Ambadas Danave critices government on Maharashtra Budget : राज्य सरकारने सोमवारी 2025-26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेला अर्थसंकल्प हा देशोधडीला लावणारा व राज्याला अधोगतीला नेणारा असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
विधान परिषदेसाठी माधव भंडारींसह भाजपची तीन नावं दिल्लीत; शिंदे-अजित पवारांना एक-एक जागा
तसेच ते पुढे म्हणाले की, घोषणा आणि थापा या भोवती हा अर्थसंकल्प फिरत आहे. सरकारला पाहिजे तेच ते सरकार जुने नव्याने सांगत आहे. लाडक्या भावाला नोकरी नाही. लाडक्या बहिणीला रक्षण नाही. ना शाळा आहे ना शिक्षण आहे. बळीराजाचे शोषण आहे. शेतकरी त्रस्त आहे. निसर्गावर भिस्त आहे. शासनाची Ai वर भिस्त आहे. ना दिलेल्या आश्वासनाचे भान आहे. ना दिलेल्या वचनाची जाण आहे. तसेच सरकार फक्त बडबडे, सोडे पोकळ घोषणांचे बुडबुडे आहेत.
पाकिस्तानातच नाही.. भारतातही अनेक वेळा रेल्वे अपहरणाच्या घटना, कधी घडल्या जाणून घ्या
या कवितेच्या माध्यमातून दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले. अर्थसंकल्पीय चर्चेवरील भाषणात बोलताना दानवे म्हणाले की, सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा घोषणांचा पाऊस असून वास्तवात महाराष्ट्र राज्य कर्जाच्या खाईत अडकत चालला आहे.
विराट कोहली एकाच धावेवर बाद, 14 वर्षीला मुलीला धक्का बसला… हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
राज्यावर 7 लाख 68 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. 2013 – 14 या वर्षांत 2 लाख 69 हजार कोटी रुपयांचे असलेले कर्ज गेल्या 10 वर्षांत 3 पटीने वाढले आहे. सरकारचे दरवर्षी 55 हजार कोटी रुपये व्याज फेडण्यासाठी जात असून भांडवली खर्चात 2 टक्के कपात करण्याची वेळ सरकारला आली आहे, असे असताना खर्च वाढवणाऱ्या योजना सरकार कशाप्रकारे राबविणार असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. महसुली तूट 45 हजार 892 कोटी तर राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार 234 कोटी रुपयांवर गेली असून ही चिंतेची बाब असल्याचे दानवे म्हणाले. वारंवार कर्ज घेऊन खर्च चालविण्याची सवय लागली आहे. उद्योग सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर हा 6.8 % वरून 4.4% वर घसरला आहे.
अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; येरवडामध्ये होणार रवानगी
केंद्राने मदतीसाठीचा हात आखडता घेतला असून जास्त निधी आणण्यास महायुती सरकारला अपयश आल्याची टीका दानवे यांनी केली. तसेच इतर राज्याच्या तुलनेत राज्याचे दरडोई उत्पन्न 5 व्या क्रमांकावर गेले आहे. भाजपने जाहीरनाम्यात केलेले 25 ठळक मुद्दे हे निवडणूकीपुरते केले असून त्यांची या अर्थसंकल्पात पूर्तता केली नाही. जीवनावश्यक गोष्टींचे भाव स्थिर नाही. राज्याची आर्थिक स्थिती पाहता 4 वर्षांत कोणती जादूची काडी फिरवून सरकार राज्याची अर्थ व्यवस्था 1 ट्रीलियन अमेरीकन डॉलर करणार असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. राज्यातील बंद पडलेले चिपी विमानतळ, शिर्डी विमानतळाची रखडलेली नाईट लँडिंग, प्रतीक्षेत असलेलं अमरावती विमानतळ तसेच राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घोषीत केलेले विविध महामंडळ यांना कोणत्याही निधीची तरतूद केली नसल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात मांडली.
गडचिरोली सुरजागड येथील खनिज संपतीची लूट करून आदिवासी बांधवांवर सरकार अन्याय करत आहे. जलजीवन विभागाअंतर्गत येणाऱ्या योजनांना अपुरा निधी, रखडलेला मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रखडलेले रस्ते विकास कामे यावरून दानवे यांनी सरकार वर टीकास्त्र डागले. सरकारचे पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले असून या अर्थ संकल्पातून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला गेला नाही. विदर्भ मराठवाडयाच्या विकासासाठी निधीची तरतूद नाही. आपलं कल्याणकारी राज्य राहण्याची आवश्यकता असताना हे सरकार कर्जबाजारी राज्य करणार असल्याचा आरोप दानवे यांनी केला.