छत्रपती संभाजी महाराजांना सासऱ्याने मारले, औरंगजेब उगाच बदनाम; बच्चू कडूंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले; या कारणानेच औरंगजेबाचे नाव बदनाम झाले असावे.

Bacchu Kadu Controversial Statement

Bacchu Kadu Controversial Statement

Bacchu Kadu Controversial Statement : शेतकरी नेते बच्चू कडू यांनी रविवारी बुलढाण्याच्या पातुर्डा गावात आयोजित शेतकरी हक्क परिषदेच्या सभा दरम्यान केलेल्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदारीची पद्धत समाप्त करण्यात आली असल्याचा उल्लेख करत म्हटले की, म्हणे त्या काळात वतनदारीमुळे गुलामशाही, निजामशाही व आदिलशाही चालत होत्या. वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले; या कारणानेच औरंगजेबाचे नाव बदनाम झाले असावे, असा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी

बच्चू कडूंचे (Bacchu Kadu) हे विधान ऐकून या चर्चेतून काही ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत (Aurangzeb) नाही. पातुर्ड्यातील सभेत ते शेतकऱ्यांसमोर शासकीय योजना व मदतीबाबतही आक्रमक होते. म्हणाले की शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी आहे. सरकारने शेतकऱ्यांचे व्यवस्थापन रंगभेदयुक्त पद्धतीने केले आहे. त्यांनी महायुती सरकारवरही निशाणा साधत (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हटले की, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रंगांत विभागल्यामुळे ते एकत्र येत नाहीत. त्यामुळे शेतकरी हा गरीब राहतो तर शहरे श्रीमंत होतात, असा कटाक्ष त्यांनी टाकला.

मला पण पाडले जाईल…

सभेत बच्चू कडू म्हणाले की अनेक नेते — जसे की शरद जोशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘पाडले’ गेले; त्याचप्रमाणे मला पण पाडले जाईल. कारण मी कुणाच्या जातीत बसलो नाही. ते म्हणाले की, शेतकरी जर आपली भूमिका मजबूत ठेवली नाही तर कोणीही त्यासाठी उभा राहणार नाही. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांवर टोकाचे विधान करताना काही ठिकाणी कठोर भाषेतही बोलले.

मंत्री संजय शिरसाटांची बच्चू कडूंवर टीका

बच्चू कडूंच्या “शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे” या धक्कादायक विधानावर विरोधात्मक प्रतिक्रिया उमटल्या. शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी बच्चू कडूंना निशाणा साधत म्हटले की, अश्या  प्रकारचे वक्तव्य करण्याआधी त्यांना विचार करावा लागेल; जर ते खरोखरच एखादा आमदार कापण्याची मागणी करत असतील तर ते स्वतःच ते काम करतील का; अन्यथा अशा वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. शिरसाटांनी असेही म्हटले की. सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते.

Exit mobile version