Girish Mahajan On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गट हा जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. (Girish Mahajan) पुढच्या आठ दिवसांत बघा त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही असं मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
ठाकरे देखील परेशान असतील
संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पण राऊतांच्या बोलण्यामुळं स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील असं महाजन म्हणाले आहेत. मात्र, आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पण पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत असा टोलाही महाजनांनी लगावला आहे.
मंत्र्यांना शेती, कृषी नको, मलाईदार खाती हवीत, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
त्याचबरोबर संजय राऊत यांच्याबद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. कोणता घोटाळा झाला काय झालं कोण अधिकारी असं महाजन म्हणाले. संजय राऊत यांना जास्त प्रसिद्धी आणि मनावर घेऊ नका असे महाजन म्हणाले. तुमची बडबड तुमचे विचार काय ते बघू निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू असंही महाजन म्हणाले.
ही मोठी जबाबदारी
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, ही मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरु आहे असं महाजन म्हणाले आहेत. कालच्या बैठकीसाठी फक्त मंत्री महोदयांना आमंत्रण होतं. आमदार खासदार यांना आमंत्रण नव्हतं. काही आमदार मुख्यमंत्री आले त्यामुळे उपस्थित होते असंही महाजन म्हणाले आहेत.