Download App

VIDEO : ‘किती विकेट गेल्या’ यापेक्षा जिंकलेला डाव महत्त्वाचा; पुण्यात CDS अनिल चौहान यांचं महत्त्वाचं विधान

CDS General Anil Chauhan On Operation Sindoor Pakistan Attack : ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘किती विकेट गेल्या’ यापेक्षा जिंकलेला डाव महत्त्वाचा, असं महत्वाचं विधान सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केलं आहे. ते पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.

कुशल सैन्य नुकसानांनी प्रभावित होत नाही. आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आणि मागे वळून पाहू नये. युद्धात नुकसानापेक्षा निकाल जास्त महत्त्वाचे असतात. ऑपरेशन सिंदूर हे युद्ध रणनीतीचे एक उदाहरण आहे, ज्यामध्ये गतिज आणि गतिज नसलेले युद्ध कौशल्ये वापरली जात होती.

भारत दहशतवादाच्या सावलीत आणि अणुहल्ल्याच्या धोक्यात राहणार नाही. पहलगाममध्ये जे घडले ते अत्यंत क्रूर होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मागील विचार पाकिस्तानने पुरस्कृत केलेला दहशतवाद (Operation Sindoor) थांबवावा, असा होता. या युद्धाचा संपूर्ण प्रारंभ बिंदू पहलगाम दहशतवादी हल्ला होता. दहशतवादाला कोणतेही निश्चित तर्क नाही. आपल्या शत्रूने हजारो जखमा देऊन भारताला रक्तबंबाळ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1965 मध्ये, झुल्फिकार अली भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना भारताविरुद्ध (Pakistan Attack) हजार वर्षांचे युद्ध घोषित केले होते.

10 मे रोजी पाकिस्तानचे उद्दिष्ट 48 तासांत भारताला पराभूत करण्याचे होते. अनेक हल्ले करण्यात आले. त्यांनी हा  संघर्ष वाढवला, ज्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. 48 तास चालेल असे त्यांना वाटलेले ऑपरेशन केवळ 8 तासांतच संपले. त्यानंतर त्यांचा फोन आला आणि त्यांनी चर्चा करायची असल्याचं सांगितलं.

‘सर्वसामान्यांचे वाली…गोपीनाथ मुंडे आजही जिवंत’; वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक, गोपीनाथ गडावर….

युद्ध आणि राजकारण समांतर

पुण्यातील एका विद्यापीठात केलेल्या भाषणात सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरवर सांगितले की, सैन्य ताकदवर असेल तर झालेल्या नुकसानापेक्षा लक्ष्य महत्वाचं असतं. आम्ही मानके उंचावली आहेत. दहशतवादाविरुद्ध लष्करी कारवाईची एक नवीन रेषा आखली आहे. पहलगाममध्ये घडलेल्या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी, पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदूंविरुद्ध विष ओकले होते.’ऑपरेशन सिंदूर’मध्येही युद्ध आणि राजकारण समांतरपणे घडत होते, असंही त्यांनी सांगितली.

प्रत्येक ऑपरेशनमध्ये रिस्क

भूतकाळाकडून आपण जे काही शिकत असतो, ते पुढे आपल्याला मदत करते. युद्ध लढणारे , ग्राउंड काम करणारे , तंत्रज्ञान हे घटक महत्वाचे असतात. लोकांच्या इमोशन महत्वाच्या असतात. त्या खूप मदत करतात. भावना, संधी आणि स्ट्रॅटजी या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑपरेशन सिंदुरमध्ये पाहायला मिळाल्या. भारत हा कायम दहशत वादाच्या विरोधात आहे. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत. ते सतत अणू बॉम्बची धमकी देत असतात. मिलिटरी ऑपरेशन या अविश्वसनीय असतात. प्रत्येक ऑपरेशनमध्ये रिस्क असते, आपली क्षमता याचा विचार करावा लागतो. भारताची क्षमता आता वाढली आहे. आपण जरी सर्जिकेल स्ट्राइक केला ही, आपल्या हवाई दलाची क्षमता आहे. प्रत्येक ऑपरेशनमध्ये रिस्क असते. आपल्याकडे न्यू ड्रोन सिस्टम आहे. वॉर ही सतत चालणारी प्रक्रिया असते.

वाल्मिक कराडची सुटका होणार?, ‘या’ दिवशी अर्जावर सुनावणी, आज कोर्टात काय काय घडलं?

भविष्यात युद्धात AI चा वापर

अवघ्या 8 मिनिटांत आपण त्यांचे दहशत वादी अड्डे उध्वस्त केले. युद्धासाठी 4 गोष्टी महत्वाच्या असतात. भविष्यात इनफार्मेशन वॉर वर काम केलं पाहिजे. युद्धासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी काम करत असते. आपल्याकडे ब्राह्मोस, छोटे ड्रोन , रडार यंत्रणा सगळ्या गोष्टी आहेत. आधी माणूस आणि माणसांत युद्ध व्हायचं. आता मशीन आणि मशीनमध्ये होत आहे. त्यासाठी टेक्नॉलजी महत्वाची आहे. स्पेस, साइबर यामध्ये भविष्यात महत्वाच्या आहेत. टॅक्टिक आणि स्ट्रॅटजी हा चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे. भविष्यातील युद्धाची स्थिती पाहता आपण आपल्यात बदल करतोय. आपलं काय नुकसान झालं, हे महत्वाचं नाही. मात्र, आपण काय प्रतिकार केला, हे महत्वाचं आहे असं म्हणत सीडीएस अनिल चौहान यांनी फुटबॉलचं उदाहरण दिलंय. तर भविष्यात युद्धात AI चा वापर होऊ शकतो, असं देखील चिफ ऑफ डिफेन्स अनिल चौहान यांनी म्हटलंय.

 

follow us