Download App

हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली; CM फडणवीसांनी क्लिअर केलं….

हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

Cm Devendra Fadanvis On Hindi Language : नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीची (Hindi Compulsary) करण्यात आली होती. या मुद्द्यावरुन राज्यभरातून टीका झाल्यानंतर आता हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकण्यात आली असून तिसरी कोणतीही शिकता येणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलंय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

धक्कादायक! खासगी बँकेने छळलं; मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या बापाची बँकेसमोर आत्महत्या

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आधी आपण हिंदी अनिवार्य केली होती, पण काल काढलेल्या जीआरमध्ये अनिवार्यता काढून टाकली आहे. जीआरमध्ये आपण म्हटलंय की, भारतातील कुठलीही तिसरी भाषा शिकता येईल. तीन भाषेचं सुत्र नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा ही अनिवार्य आहे. एक भारतीय भाषा आणि एक इंग्रजी आपण शिकतो, त्यामुळे तिसरी कुठलीही भाषा जशी की हिंदी किंवा अन्य कोणतीही त्यासाठी आम्ही शिक्षक उपलब्ध करुन देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

“होय, आमच्यात थोडा विसंवाद झाला, पण..” बावनकुळेंचं म्हणणं मान्य करत महाजनांचा फुलस्टॉप!

तसेच तिसऱ्या भाषेत आपण हिंदीची अनिवार्यता काढलीयं. कोणत्याही भाषेत शिकण्याचा पर्याय आपण दिलायं. आपण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो. आता आपण इंजिनिअरींग हे मराठी शिकवायला लागलो आहोत. तसेच डॉक्टर, एमबीए मराठीत शिकवत आहोत. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठईला वैश्विक भाषा ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचा दालन उभं केलंय. कोणतीही शाळा असो मराठी अनिवार्य असणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

देशभरात तीन भाषांचं सुत्र…
राज ठाकरेंचा आग्रह आहे की, दोनच भाषा पाहिजे तिसरी लादू नका, त्यांना मी समजावून सांगितलं की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषांचं सुत्र आहे. त्यामुळे देशात तीन भाषांचं सुत्र असेल तर महाराष्ट्र दोन भाषेवर जाऊ शकत नाही. देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यात गैर काय? केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून तीन भाषेंचं सुत्र ठेवलं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

follow us