Download App

कोणाचाही बाप काढणे चुकीचे; ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना फटकारले

Devendra Fadnavis यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे केलेल्या वक्तव्यासाठी फटकारले आहे.

Devendra Fadnavis reprimands Nitesh Rane for Statment on Shivsena : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे नुकताच पार पडलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्य भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असतेच, म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाली आहे असा टोला मंत्री राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) लगावला होता. त्यावरून शिंदे आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नितेश राणेंना फटकारले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना फटकारले

कुणाचाही बाप काढणं चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वत: सांगितलं की, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. पण मी त्यांना सांगितलं की, तुमच्या मनात तो अर्थ नसला तरी परसेप्शनमध्ये तो अर्थ जातो. राजकारणात तोच अर्थ महत्त्वाचा असतो. त्यामुळे आशा प्रकार बोलणं योग्य नाही. त्यांनी देखील ते मान्य केलेलं आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नितेश राणेंना फटकारले आहे.

बीड जिल्हा आर्थिक विकासानेच नाही, तर सामाजिक स्तरावरही घसरला…बालविवाहांचं भयान वास्तव

जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेते धुसफूस सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेतील नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. महायुतीचं सरकार असतानाच स्थगिती दिली गेल्याने विरोधकांनी टीका सुरू केली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतरच स्थगिती दिली गेली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

follow us