बीड जिल्हा आर्थिक विकासानेच नाही, तर सामाजिक स्तरावरही घसरला…बालविवाहांचं भयान वास्तव

Social Situation In Beed District : बीड जिल्हा हा आर्थिक विकासाने मागं असल्याची गेली अनेक दिवसांची स्थिती आहे. मात्र, हा जिल्हा सामाजिक विकासामध्येही मागे असल्याचं वेळोवेळी आढळून आलय. (Beed) गेल्या वर्षी एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 300 हून अधिक बालविवाह झाल्याची नोंद आहे. तर 258 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
बीड जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्याच माध्यमातून काही बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. मात्र, जिल्ह्यात बालविवाह रोखले जात असल्याने इतर ठिकाणी जाऊन बालविवाह होत असल्याची माहिती समोर येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचं जिल्हा बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात प्रामुख्याने ऊसतोड कामगार मुलांच्या बालविवाहाचा समावेश आहे.
Video : मी काय माझ्या खिशातले पैसे देतो का?, निधी वळवल्याच्या आरोपांवर अजित पवार
बीड जिल्हा समन्वयक बाल प्रकल्प अधिकारी अश्विनी जगताप यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाने केलेल्या जागृतीमुळे आणि कडक अंमलबजावणी केल्यामुळे बालविवाहांची संख्या कमी झाली आहे. पण अजूनही अनेक लोक हे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन बालविवाह लावतात ही चिंतेची बाब आहे. तसंच, अनेक ठिकाणी बालविवाह होत असले तरी ते उघडकीस येत नाहीत. त्यामुळे बालविवाहांची संख्या ही नोंद केलेल्या संख्येपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील त्या ठिकाणचे सरपंच, तलाठी यांच्यामार्फत फॉलोअप घेतला जातो आणि अर्ध्या तासात तो बालविवाह रोखला जातो अशी माहिती अश्विनी जगताप यांनी दिली. दरम्यान, परिस्थितीमुळं पालकांकडून निवडला जातो. त्याच आधारावर बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बालविवाहाचं सारखं प्रमाण आढळून आले आहे.