Download App

‘शरद पवारांनी राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात तरी निसंशय मराठीवादी भूमिका घ्यावी’ – दीपक पवार

हिंदी भाषा सक्तीविरोधात मैदानात उतरणार असल्याचा इशारा मराठी भाषा केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी दिला आहे.

Hindi Language Compulsary : शरद पवारांनी राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात तरी निसंशय मराठीवादी भूमिका घ्यावी, असं विधान मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी केलंय. दरम्यान, सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीची (Hindi Language Compulsary) करण्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र आहे. राज्य सरकारकडून हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आता विरोधकांसह मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीची केल्यास सरकारविरोधात मैदानात उतरणार असल्याचं दीपक पवारांनी स्पष्ट केलंय.

पुढे बोलताना दीपक पवार म्हणाले, आम्ही हिंदी भाषा सक्ती विरोधात सगळ्या पक्षाकडे जाऊन मराठी भाषेसाठी साथ देण्याचे आवाहन करणार आहोत. सरकारने आम्हाला निमंत्रण दिले नाही किंवा आमच्याशी सल्लामलत केले नाहीत. मुलांना हिंदी भाषा सक्तीची नको हे आम्ही सिद्ध करुन पण सरकारने हिंदी सक्तीची कशी हे सिद्ध करावे, असं खुलं आव्हान दीपक पवार यांनी दिलंय.

इंग्लंडची विजयी सलामी; भारतावर 5 विकेट्सने मात, शुबमनने फलंदाजांवर फोडल पराभवाचं खापर

हिंदी भाषेच्या मुद्द्यावर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. पहिलीच्या मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको, परंतु हिंदी भाषा शिकण महत्वाच आहे. देशात 55 टक्के हिंदी भाषा बोलणारे लोकं आहेत. सध्या पाचवीपासून पुढे हिंदी भाषा शिकवली जाते, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही दीपक पवार यांनी भाष्य केलंय. शरद पवारांनी राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात तरी निसंशय मराठीवादी भूमिका घ्यावी, असं दीपक पवार यांनी म्हटलंय.

आम्ही हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मैदानात उतरुन राज्य सरकारच्या अध्यादेशाची 29 जूनला होळी करणार आहोत. तर 7 जुलैला मुंबईतीतल आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचंही दीपक पवार यांनी स्पष्ट केलंय.

CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
आधी आपण हिंदी अनिवार्य केली होती, पण काल काढलेल्या जीआरमध्ये अनिवार्यता काढून टाकली आहे. जीआरमध्ये आपण म्हटलंय की, भारतातील कुठलीही तिसरी भाषा शिकता येईल. तीन भाषेचं सुत्र नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा ही अनिवार्य आहे. एक भारतीय भाषा आणि एक इंग्रजी आपण शिकतो, त्यामुळे तिसरी कुठलीही भाषा जशी की हिंदी किंवा अन्य कोणतीही त्यासाठी आम्ही शिक्षक उपलब्ध करुन देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

follow us