Download App

Road Accident : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; तरुणीसह महिला जागीच ठार

Road Accident : राज्यात रस्ते अपघातात (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. काल समृद्धी महामार्गावर झालेली अपघाताची घटना ताजी असतानाच आज नगर-कल्याण महामार्गावर असाच भीषण अपघात झाला आहे. पायी जाणाऱ्या तरुणीसह एका दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात घडली.

समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात! भरधाव कार उलटून एकाचा मृत्यू

या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल (Road Accident)करण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तरुणी पायी घरी चालली होती. त्याचवेळी एका दुचाकीवर दोघे जण आळेफाट्याच्या दिशेने जात होते. या दरम्यान भरधाव वेगातील पिकअप रस्त्याने चालला होता. या पिकअपने काही कळण्याच्या आतच रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या तरुणीसह दुचाकीलाही धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पिकअप सुद्धा रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या पिकअप चालकाने पिकअप सोडून घटनास्थळावरून पळ काढला. आता पोलीस या पिकअप चालकाचा शोध घेत आहेत.

समृद्धी महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला

दरम्यान, याआधी काल समृद्धी महामार्गावरही असाच भीषण अपघात (Road Accidnet) घडला. गौरी गणपतीच्या सणासाठी पुण्याहून अमरावतीकडे निघालेल्या कारचा वन्यप्राणी आडवे आल्याने अपघात झाला. या प्राण्याच्या वाचविण्याच्या नादात कार तीन वेळा पलटी झाली. त्यामुळे कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अपघाताची घटना नगर-कल्याण महामार्गावर घडली आहे.

Kolhapur : लाखो गुंतवणुकदारांना तीन हजार कोटींना गंडविणारा जेरबंद; कसा घातला गंडा? वाचा…

महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Tags

follow us