Download App

मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागं पाळीव कुत्र्यासारखे फिरता; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटतं आहेत, त्यातल्या किती जगा काँग्रेसला द्यायच्या ठरल्या होत्या?. स्वतःच्या मित्र पक्षाला भीक न घालण्याचे काम उबाठाकडून होतय. दिल्लीत ज्या जागांची चर्चा प्रलंबित होती, त्या जागा उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्यात. जो उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचा झाला नाही तो काँग्रेस आणि शरद पवार गटाचा होईल का? अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

बेईमानी शिवाय उद्धव ठाकरेंनी काही केलं नाही. काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात काँग्रेसला झुकते माप का नाही? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. आज उद्धव ठाकरेला भाजपाची आठवण आली असेल, तेव्हा 120 जागा मिळाल्या. पण आता नाक रगडून 100 मिळत नाहीत. असंही ते म्हणाले आहेत.

तिढा कायम! आधी घोषणा मग माघार का?, उद्धव ठाकरे चार ते पाच जागी उमेदवार बदलण्याची शक्यता

काँग्रेसने विचार करावा उद्धव ठाकरे यांनी कोकणात राष्ट्रीय काँग्रेसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. एकनाथ शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होता त्याच काय झालं?. आदित्य ठाकरे केवळ वडिलांसारख्या सुक्या धमक्या देतो का? वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्य मागे माजी आमदार लागणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे असताना, सगळे मोठे नेते मातोश्रीवर यायचे. 10 जनपथवरुन राहुल गांधी मातोश्रीवर आलाय का? त्याला मातोश्रीचा पत्ता माहित आहे का?. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागून पाळीव कुत्र्यासारखं फिरत आहेत अशी जहरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

follow us