Download App

Raj Thackeray : ‘इथे सरकारचं चुकलं हे निश्चित’; लाठीमाराच्या घटनेवर राज ठाकरेंनी फटकारलं

Raj Thackeray : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाठीमाराचा निषेध व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो.

‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद करा, राजीनामा द्या’; संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचा संताप !

इथे सरकारचं चुकलं हे निश्चित

या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेऊन आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा जगाने आदर्श घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की पूर्व इतिहास पाहता आंदोलकांनी कोणतच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे येथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा, तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का?, ते न्यायालयात टिकेल का?, बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घोडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल? यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?, इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाही तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

Maratha Reservation Protest : जालन्यातील लाठीचार्जनंतर एस टी महामंडळ सतर्क; एसटीच्या फेऱ्या बंद

याला 20 वर्षांचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार

काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे. पण ते ज्या कारणांनी घडलं त्याला गेल्या वीस वर्षात महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. याव दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं यातून जे काही शौर्य दाखवण्याची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज