Download App

‘संधीसाधू लोक गेले, पक्षाला दगा देणे त्यांना’.. गोऱ्हेंच्या पक्षप्रवेशावर परब संतापले

Anil Parab : ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटातील काही नेत्यांवर टीका केली होती. यानंतर आता ठाकरे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा आम्ही भरून काढू. पण, सगळी पदे उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणे व वार करणे हे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना शोभत नाही, अशी घणाघाती टीका परब यांनी केली.

शरद पवारांच्या वयावरून ‘त्यांचा’ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा टोला

गोऱ्हे यांनी शिवसैनिकांच्या कष्टाच्या जोरावर चार वेळा आमदारकी मिळवली. ज्या शिवसैनिकांच्या जीवावर त्यांना ही सगळी पदे मिळाली त्यांना आता या निर्णयाने काय यातना होत असतील असा सवाल परब यांनी उपस्थित केला.

याआधी गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या, 92 नंतर युपीए आणि एनडीए अशा दोन आघाड्या झाल्या. मी 1998 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मला तेथे चांगले काम करता आले. सध्या निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षच अधिकृत शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. तसेच त्यांना पत्रकारांनी त्यांना सुषमा अंधारेंबद्दलही प्रश्न विचारला होता. सटरफटर लोकांमुळे पक्षातील नेत्यांत नाराजी नसते, असे उत्तर गोऱ्हे यांनी दिले होते.

राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा

ठाकरे गटाच्या प्रमुख महिला नेत्या 

गोऱ्हे या उद्धव ठाकरे गटाच्या एकनिष्ठ म्हणून ओळखल्या जात होत्या. पक्षातील प्रमुख महिला नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसेच त्याआधी भाजपबरोबर युती तुटल्यानंतरच्या काळात त्यांनी ठाकरे गटाची बाजू समर्थपणे सांभाळली होती. विधानपरिषदेतील उपसभापती म्हणूनही त्यांचे काम चांगले चालले होते. असे असतानाही त्या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांत वादाची स्थिती निर्माण झाली होती. विधानपरिषदेत गोऱ्हे या उपसभापती असूनही बोलू देत नाहीत अशी तक्रार ठाकरे गटातील आमदारांची होती.

Tags

follow us