Download App

Sanjay Raut : कंगना, ही कोण शहाणी ? ती तर.. राऊतांनी कंगनाला फटकारले

Sanjay Raut : अभिनेत्री कंगना राणावत (kangana Ranaut) आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता महाविकास आघाडी सरकार नाही. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरही कंगनाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाबद्दल वक्तव्य केले आहे.

या कार्यक्रमात राऊत यांना कंगनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, की ‘कंगना तर एक पोलिटिकल अॅक्टर आहे. तिने आम्हाला आव्हान दिले होते. मुळात भांडण कधी सुरू झाले हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आमच्यावर टीका केली हरकत नाही. पण, जर तुम्ही मुंबईचा पाकिस्तान केला म्हणाल तर ही कोण शहाणी ?’ ‘आम्ही मुंबईचा पाकिस्तान केला नाही तर मुंबईचा पाकिस्तान होण्यापासून वारंवार वाचविले आहे बाळासाहेब ठाकरेंनी’ असे राऊत म्हणाले.

वाचा : संजय राऊत यांचं नाव संजय आगलावे असं करा, शहाजीबापू पाटील यांचा टोला

‘दाऊद गँगबरोबर आम्ही लढाई केली आहे. आमची माणसे त्यात मारली गेली आहेत. हे एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) तरी माहिती आहे का ?, जे दाऊद दाऊद करतात त्यांना माहित तरी आहे का, की 1992 मध्ये याच दाऊद गँगशी लढताना आमची 140 माणसे मारली गेली. माझ्यावरही केसेस दाखल आहेत. मी अजूनही न्यायालयात जात आहे. असे असताना जर ही म्हणत असेल की आम्ही मुंबईचा पाकिस्तान केला. तिला काही अक्कल आहे का ?,’ अशा तीव्र शब्दांत राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.

Sanjay Raut : नेता असाच असतो मोकळा ढाकळा; अजितदादांचा व्हिडीओ शेअर करत राणेंना टोला

हे सरकार फार काळ नाही

‘सध्याचे सरकार फार काळ टिकणार नाही. कदाचित फेब्रुवारी एप्रिलपर्यंतच असेल. ज्या पद्धतीने आमचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. जे शिवसेना (Shiv Sena) सोडून गेले आहेत ते सगळे लोक अपात्र ठरणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते सगळे चाळीस लोक अपात्र होणार आहेत असे राऊत यांनी सांगितले. हे काही स्वप्न नाही तर सत्य आहे’ असे राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=7iDNg6drHRA

Tags

follow us