Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असून आता लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरुन देखील आता विरोधक महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. या योजनेत सरसकट लाभ देणे चुकीचं होते अशी कबुली माध्यमांशी बोलताना दिली आहे.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी ही योजना आम्ही लागू केली तेव्हा आमच्याकडे फार काळ कमी होता. तेव्हा 2-3 महिन्यातच निवडणुका लागणार होत्या. त्यामुळे या योजनेत सर्वकाही तपासण्यासाठी जेवढा वेळ पाहिजे होता तितका मिळाला नाही. मात्र तरी देखील आम्ही आवाहन केलं होतं. असं वाटलं होतो की, जे या योजनेसाठी पात्र नाही ते अर्ज करणार नाही. परंतु काहींनी अपात्र असून देखील या योजनेत अर्ज केले आहे. असं अजित पवार म्हणाले.
तसेच या योजनेत अपात्र महिलांना दिलेले पैसे परत घेणार नाही आणि कारवाई देखील करणार नाही अशी भूमिका देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. तर आता योजनेतील अर्जांच्या पडताळणीचे काम सुरु असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल. असं देखील अजित पवार म्हणाले.
तर दुसरीकडे या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे.
तनपुरे कारखाना निवडणुकीत विखे – कर्डिलेंची तटस्थ भूमिका…शेटेंचा पराभव
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जर लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींना लाभ दिला असं अजित पवार म्हणत असेल तर त्यांनी प्रायाश्चित म्हणून राजीनामा दिला पाहिजे. अर्थखात्यातून घोटाळा झाला आहे. या राज्याचे पैसे लुटले कुणी? लाडक्या बहिणींनी नाही तर लाडकी भावांनी नावं बदलून हा लाभ घेतला. असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.