Download App

Maratha Reservation : ‘दिल्लीवरुन आता निर्णयच घेऊन या’; जरांगे पाटलांनी शेवटचं सांगितलं

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीवरुन निर्णयच घेऊन राज्यात यावं, समाज तुमच्या निर्णयाची वाट पाहतोयं, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी शेवटचं सांगितलं आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगेंनी उपोषण सुरु करताच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यावर जरांगेंनी आपली भूमिका मांडली आहे.

Manoj Jarange यांनी पाणी तरी प्राशन करावं; संभाजीराजे पोहचले आंतरवाली सराटीत

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या हाय कमांड नेत्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णयच घेऊन राज्यात यावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Sanjay Raut : ‘काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला असून त्यामुळे मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्नभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर) संपली.

नामदेव शास्त्री : भगवान गडावरील 72 वर्षांचा दसरा मेळावा ते पंकजा मुंडेंना आशीर्वाद

जरांगे पाटील म्हणाले, आधी 17 दिवसांचे उपोषण केले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांच्या शब्दानंतर आपण 40 दिवसांची मुदत दिली. पण या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, मग आमचं काय चुकलं? आमच्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना आरक्षण आहे, पण आम्हालाच आरक्षणापासून डावललं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाचा जीआर घेऊन येत नाही तोपर्यंत शासनातील कोणाशीही संवाद साधणार नसल्याच सांगितलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करत असल्याचही त्यांनी सांगितलं. कोणी नेता आला तर त्याला शांततेत परत पाठवा, कुठेही दंगा करु नका. उग्र आंदोलन, जाळपोळ होणार नाही याची काळजी घ्या. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन यावेळी त्यांनी मराठा समाजाला केले.

follow us